शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरन्यायाधीशही ‘आरटीआय’च्या कक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 06:14 IST

भारताच्या सरन्यायाधीशांचे पद माहिती अधिकार कायद्यातील (आरटीआय) ‘सार्वजनिक प्राधिकारी’ या संज्ञेच्या व्याख्येत बसते.

नवी दिल्ली : भारताच्या सरन्यायाधीशांचे पद माहिती अधिकार कायद्यातील (आरटीआय) ‘सार्वजनिक प्राधिकारी’ या संज्ञेच्या व्याख्येत बसते. त्यामुळे सरन्यायाधीशांचे कार्यालयही नागरिकांना माहिती देण्यास बांधील आहे, असा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने पारदर्शी कारभाराचे महत्त्व अधोरेखित केले.विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्वत:चेच अपील फेटाळून हा निकाल दिला. सरन्यायाधीशांचे पदही ‘आरटीआय’च्या कक्षेत येते, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिला होता. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने अपील केले होते. ४ एप्रिल रोजी राखून ठेवलेला या अपिलावरील निकाल सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एन.व्ही. रमणा, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. दीपक गुप्ता व न्या. संजीव खन्ना यांच्या घटनापीठाने जाहीर केला. निकालपत्रातील काही अंश वाचून दाखविताना ‘न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य व उत्तरदायित्व’ या परस्परावलंबी गोष्टी असल्याचा निष्कर्ष नमूद केला गेला.>का उद्भवले प्रकरण?सुभाषचंद्र अगरवाल यांनी सुमारे १३ वर्षांपूर्वी केलेल्या ‘आरटीआय’ अर्जातून या प्रकरणातील वादमुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या न्या. एच.एल. दत्तू, न्या. ए.के. गांगुली व न्या. आर.एम. लोढा यांच्या नेमणुका अन्य काही न्यायाधीशांची सेवाज्येष्ठता डावलून व पंतप्रधान कार्यालयाने त्यासंदर्भात घेतलेले आक्षेप फेटाळून केल्या गेल्या होत्या.अगरवाल यांनी ‘आरटीआय’ अन्वये अर्ज करून या नेमणुकांसंबंधी कॉलेजियममध्ये झालेल्या निर्णयप्रक्रियेची माहिती मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या जनमाहिती अधिकाऱ्याने ती देण्यास नकार दिला. त्याविरुद्ध दाद मागितली असता केंद्रीय माहिती आयोगाने ती माहिती देण्याचा आदेश दिला गेला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने त्याविरुद्ध केलेले अपील दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर हे अपील केले गेले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय