शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेना खासदार संजय जाधवांना फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 1:21 PM

माझं भवितव्य काय होतं? एका शेतकऱ्याचा मुलगा हा माझा भूतकाळ आहे. माझ्या आयुष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघातील जनता दोघांना महत्त्वाचं स्थान आहे असं संजय जाधव यांनी सांगितले.

नवी दिल्ली - शिवसेना आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी होतील असं बोललं जात आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊनही त्यांना स्पष्ट शब्दात नकार देणारे खासदार संजय जाधव यांनी पक्षाने मला भरभरून दिले आहे. त्यामुळे मी मूळ शिवसेनेतच आहे असं म्हटलं आहे. 

खासदार संजय जाधव म्हणाले की, मी शिवसेनेत कार्यकर्त्यापासून नेता झालोय, अपेक्षेपेक्षा खूप जास्त पक्षाने दिले. एवढं पक्षाने दिल्यानंतर पक्षाची प्रतारणा करणं हे माझ्या विचारात बसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र विधानसभेत आलो होतो. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आनंद आहे. तुटेपर्यंत ताणू नये. एका वटवृक्षाखाली वाढलो त्यावर घाव घालताना वेदना होतात. एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समेट घडवून आणावा. सामान्य शिवसैनिकाचं यात नुकसान होत आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत मी पंढरपूरमध्ये असताना मला त्यांचा फोन आला. मी महापूजेला गेलो होते. तिथे बोलण्याचा योग आला नाही. मुख्यमंत्री म्हणून मंदिरात मी त्यांचा सन्मान केला. सोबत या असं ते म्हणाले. पण मी मूळ शिवसेनेतच आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा त्याला शिवसेनेने भरभरून दिले. माझ्या जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकाची भावना मूळ शिवसेनेत राहिलं पाहिजे. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे. मी स्पष्टपणे शिंदे गटास जाण्यास नकार दिला. मी येतो म्हणायचं आणि नकार द्यायचं असं खोटं कुणी बोलू नये असं सांगत खासदार संजय जाधव यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 

दरम्यान, माझं भवितव्य काय होतं? एका शेतकऱ्याचा मुलगा हा माझा भूतकाळ आहे. माझ्या आयुष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघातील जनता दोघांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे मी कधीही त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही. राजकारणात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. जेव्हा मविआ झाली त्यातून आम्हाला जशी वागणूक मिळाली तशी ती मिळाली नाही. त्याची खंत मी बोलून दाखवली. सत्ता असून काय उपयोग असा सवाल कार्यकर्ते करायचे. संघर्ष जिथे उभा राहील तिथे करू पण त्यासाठी पक्ष सोडणं पर्याय नाही असंही संजय जाधव यांनी सांगितले. 

पैसा आयुष्यात सगळं काही नाही५०-६० कोटी जी काही ऑफर आहे मला माहिती नाही. माझ्याशी कुणी संपर्क केला नाही. पुढचा विचार कुणी कुणाचा केला नाही. माणसानं समाधान मानलं तर त्याच्या एवढा आयुष्यात सुखी कुणी नाही. पैशासाठी सगळं काही नाही. पैसा गरजेचा पण सर्वकाही नाही. शेवटी गाठोडं भरून कुणीच घेऊन जाणार नाही त्यामुळे पैशासाठी पक्ष सोडणं मला पटत नाही असंही संजय जाधवांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे