शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

"मोदींना श्रीरामाचा आशीर्वाद, जे देवाचं अस्तित्व नाकारतात ते..", संजय राऊतांना सणसणीत चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 3:44 PM

राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी घेतला खरपूस समाचार

Ram Mandir PM Modi Sanjay Raut : राम जन्मभूमीचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होता. काही महिन्यांपूर्वी या मंदिराचे भूमिपुजन झाले आणि आता २२ जानेवारी २०२४ ला रामलल्ला अयोध्येच्या राममंदिरात विराजमान होणार आहेत. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. राम जन्मभूमी न्यासाकडून त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, त्यांना निमंत्रण देण्याची काहीच गरज नव्हती. ते स्वत:हून आले असते. यावर आता थेट राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.  

राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, "प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पात्रतेनुसार बोलतो. संजय राऊत यांना नेहमी निवडणुकाच दिसतात. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा हा विश्वास, श्रद्धा आणि आस्थेचा प्रश्न आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराची पायाभरणी आणि भूमिपुजनासाठीही पंतप्रधान मोदी आले होते. यावेळच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रणही मोदींनी स्वीकारले आहे."

"राम मंदिराची नव्याने उभारणी ही बाब बलिदानाशी जोडू नका. हा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. राजकारण आणि निवडणुका या गोष्टी येत-जात राहतात, त्याबद्दल फारसा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. सर्व राजकीय पक्षांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंतप्रधान मोदींना खुद्द प्रभूश्रीरामाचा आशीर्वाद आहे. म्हणूनच ते सत्तेत आहेत आणि यापुढेही राहतील. जे लोक श्रीरामाचे अस्तित्व आणि देवत्व नाकारतात ते रस्त्यावरच फिरत बसतात आणि त्यांना यापुढेही तेच करत बसावं लागेल."

संजय राऊत काय म्हणाले होते?

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर बोलताना राऊतांना पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. "पंतप्रधान मोदी यांना अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्याची काहीच गरज नव्हती. ते स्वत:हूनच आले असते. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे ते नक्कीच हजर राहिले असते. राम मंदिराबद्दलचा इतका मोठा कार्यक्रम कोणी का सोडेल? राम मंदिर बांधणीसाठी हजारो कारसेवकांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले. सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष यात सहभागी होते. शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद सारेच यात सहभागी होते. लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती. या साऱ्या गोष्टींचा एकत्रित निकाल म्हणजे राम मंदिराची उभारणी आहे. त्यामुळे मोदीजी नक्कीच जातील. पण मला असं वाटतं की आता निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे राम मंदिर हा मुद्दा निवडणुकांसाठी वापरला जाणार आहे," असा आरोप राऊतांनी केला.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSanjay Rautसंजय राऊतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी