शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

मोहन भागवतांचे विधान, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी घेतली हरकत; स्पष्ट शब्दांत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 10:06 IST

Ram Mandir Pujari Reaction On RSS Chief Mohan Bhagwat Statement: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टिकोन योग्य असल्याचे सांगत अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ram Mandir Pujari Reaction On RSS Chief Mohan Bhagwat Statement: लोभ, लालूच आणि आकसातून देवतांची होणारी हेटाळणी अमान्य आहे. धर्म हा प्राचीन असून, धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. ती योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती होते आहे, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले होते. यावरून देशभरात गदारोळ होत असलेला पाहायला मिळत आहे. संत-महंत या विधानावरून नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. यातच राम मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या महंत सत्येंद्र दास यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. 

RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभरात मंदिर-मशीद वाद वाढवण्याच्या घटनांबद्दल नुकत्याच केलेल्या विधानावर महाकुंभासाठी आलेल्या साधूसंतांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही साधूंनी मंदिरांवर पुन्हा दावा केला पाहिजे, अशी भूमिका मांडली तर काहींनी घटनात्मक चौकटींच्या अधीन राहूनच असे प्रश्न सोडवले पाहिजेत, असे म्हटले आहे. गेल्या वर्षभरात देशातील वाराणसी, मथुरा, संभल, भोजपूर, अजमेर अशा विविध ठिकाणच्या मुस्लीम धार्मिक स्थळांवर दावा करणाऱ्या याचिका वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत.

निर्णायक कृती करण्याची गरज, योगी आदित्यनाथ यांचा दृष्टीकोन योग्य

महंत सत्येंद्र दास १ मार्च १९९२ पासून राम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. अयोध्येतील नवीन भव्य राम मंदिरातही ते रामसेवा करत आहेत. मोहन भागवत यांच्या विधानावर भाष्य करताना महंत सत्येंद्र दास यांनी सांगितले की, ऐतिहासिक मंदिरांच्या जागांवर पुन्हा दावा करण्यासाठी निर्णायक कृती करण्याची गरज आहे. हिंदूंचे विस्थापन करून मंदिरे ताब्यात घेण्यात आली होती, असे तपासात आढळले तर त्यांच्यावर पुन्हा दावा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा ठिकाणांची ओळख पटवण्याचा आणि पूजा पुन्हा सुरू करण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टीकोन योग्य आहे, असे महंत सत्येंद्र दास यांनी नमूद केले. 

दरम्यान, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी सरसंघचालकांच्या राष्ट्रीय सौहार्द कायम राखण्यासंबंधी व्यापक दृष्टीकोनाला पाठिंबा दिला आहे. भारत सध्या आणखी अंतर्गत संघर्ष सहन करण्याच्या परिस्थितीत नाही. आपण मोहन भागवत यांच्या विधानाचे महत्त्व ओळखले पाहिजे. धार्मिक आणि राष्ट्रीय प्रश्न घटनात्मक चौकटीतच सोडवले पाहिजे, आपल्या देशाला पुन्हा नागरी युद्धसदृश्य परिस्थिती परवडणार नाही, असे स्वामी जितेंद्रानंद सरस्वती स्पष्ट केले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याKumbh Melaकुंभ मेळा