शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
3
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
4
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
5
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
6
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
7
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
8
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
9
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
11
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
13
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
14
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
15
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
16
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
17
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
18
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
19
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
20
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

बालविवाहामुळे स्वत: जीवनसाथी निवडण्याच्या हक्कावर येते गदा, सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 1:41 PM

‘सोसायटी फॉर एनलाइटनमेंट अँड व्हॉलंटरी ॲक्शन’ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला...

नवी दिल्ली : बालविवाहामुळे स्वत: जीवनसाथी निवडण्याच्या हक्कावर गदा येते. हा हक्क वैयक्तिक कायद्याचा वापर करून हिरावून घेता येणार नाही, असे  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या संदर्भातील निकालपत्रात शुक्रवारी म्हटले आहे. ज्या प्रथा, रुढी वैयक्तिक कायद्यांमध्ये अंतर्भूत आहेत, त्यांचा आधार घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याची (पीसीएमए) अंमलबजावणी रोखता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

‘सोसायटी फॉर एनलाइटनमेंट अँड व्हॉलंटरी ॲक्शन’ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. बालविवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती. बालविवाह प्रतिबंधक कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या निकालामध्ये केलेल्या समाजशास्त्रीय विश्लेषणाकडे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, लहान वयातच मुलांचा विवाह करणे ही सामाजिक कुप्रथा आहे. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनसाथी निवडण्याच्या अधिकारावर गदा येते. ही मुले प्रौढ होण्याआधीच त्यांच्याकडून जोडीदार निवडण्याचा व आपल्याला हवे तसे जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जातो. 

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बालविवाहांमुळे वंचित गटातील मुले विशेषत: मुलींवर मोठा अन्याय होतो. जात, लिंग, सामाजिक-आर्थिक दर्जा अशा अनेक गोष्टी बालविवाह करताना लक्षात घेतल्या जातात. 

‘शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य ही बालविवाहांमागील महत्त्वाची कारणे’सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, दारिद्र्य, लिंग, असमानता, शिक्षणाचा अभाव ही बालविवाहामागील महत्त्वाची कारणे आहेत. असे विवाह रोखण्यासाठी विविध समुदायांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी. समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने प्रयत्न केल्याशिवाय बालविवाह प्रतिबंधक कायद्याची उत्तम अंमलबजावणी होऊ शकणार नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय