शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 06:41 IST

Jammu Bus Attack: एकीकडे दहशतवादी आमच्या बसवर बेछूट गाेळीबार करत हाेते. मी मुलांना बसमधील आसनांच्या खाली लपविले आणि स्वत: खाली वाकून हाेताे. ते भयावह २०-२५ मिनिटे आयुष्यात विसरू शकणार नाही, हे शब्द आहेत जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या भवानी शंकर यांचे.

 नवी दिल्ली/जम्मू - एकीकडे दहशतवादी आमच्या बसवर बेछूट गाेळीबार करत हाेते. मी मुलांना बसमधील आसनांच्या खाली लपविले आणि स्वत: खाली वाकून हाेताे. ते भयावह २०-२५ मिनिटे आयुष्यात विसरू शकणार नाही, हे शब्द आहेत जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या भवानी शंकर यांचे. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला तर ४१ जण जखमी झाले.

शंकर हे दिल्लीतील रहिवासी. पत्नी राधा देवी, दाेन लहान मुलांसह ते शिव खाेडी येथे या बसमधून जात हाेते. दहशतवाद्यांनी १० ते १५ सेकंदांमध्ये २० ते २५ गाेळ्या बसवर झाडल्या. एक गाेळी बसचालकाला लागली आणि त्यामुळे बस अनियंत्रित झाल आणि दरीत खडकांमध्ये अडकली. काही जण ‘हमला हाे गया हैं’, असे ओरडू लागल्याचे शंकर यांनी सांगितले.  

बहीण-भावांना आई-वडिलांची प्रतीक्षामृतांमध्ये जयपूरचे  कापड व्यापारी राजेंद्र सैनी (४२), त्यांची पत्नी ममता (४०), त्यांची नातेवाईक पूजा सैनी (३०) आणि तिचा दोन वर्षांचा मुलगा टीटू यांचा समावेश आहे. याशिवाय शिवम गुप्ता, रुबी आणि १४ वर्षीय अनुराग वर्मा (सर्व रा.  उत्तर प्रदेश) यांचाही मृत्यू झाला आहे. ममता आणि राजेंद्र सैनी यांची तीन मुले वैष्णोदेवी यात्रेवरून त्यांचे आई-वडील परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

तीन संघटनांनी घेतली हल्ल्याची जबाबदारी पीपल्स ॲंटी रेसिस्ट फाेर्स, रिव्हायवल ऑफ रिझिस्टन्स आणि द रेझिस्टंट फाेर्स या लष्कर-ऐ-ताेयबा आणि जैश-ए-माेहम्मद या दहशवादी संघटनांशी संबंधित संघटनांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली हाेती. मात्र, नंतर त्यांनी जबाबदारी झटकली. 

तीन दहशतवाद्यांनी केला हल्ला, विदेशी रायफलचा केला वापरजम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात प्रवासी बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), राज्य तपास यंत्रणा (एसआयए) आणि फॉरेन्सिक विभागाच्या पथकांनी दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली आणि तपास सुरू केला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात तीन पाकिस्तानी दहशतवादी सामील हाेते. त्यांनी ‘एम४’ रायफलींचा वापर केला. आणखी दाेन दहशतवादी रियासी जिल्ह्यात अद्यापही लपून आहेत. दहशतवाद्यांनी सुरंगातून नियंत्रण रेषा पार केली. सर्वप्रथम त्यांनी राजाैरी आणि पुंछमधील जंगलांमध्ये रेकी केली हाेती. घनदाट जंगलामुळे सुरक्षा दलांना शाेधमाेहिमेमध्ये अडथळे निर्माण हाेत आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी