शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

चीनची आगळीक सुरूच; 30 दिवसांत 35 वेळा घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 08:48 IST

संवेदनशील भागांमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चीनकडून वारंवार घुसखोरी केली जातं आहे. गेल्या महिन्याभरात चिनी सैन्यानं तब्बल 35 वेळा भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) या घुसखोरीला तीव्र विरोध केल्यामुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली. एका बाजूला पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू असताना दुसऱ्या बाजूला चीननं घुसखोरी सुरू केल्यानं भारताची डोकेदुखी वाढली आहे. एका हिंदी संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात चिनी सैन्यानं लडाखच्या उत्तर भागात सकाळी 7 वाजता घुसखोरी केली. चिनी सैनिक त्यांच्या वाहनातून जवळपास 14 किलोमीटर आत घुसले होते. त्यानंतर त्यांना इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी रोखलं. याशिवाय चिनी सैन्यानं लडाखच्या ट्रिग हाईट भागातदेखील अनेकदा घुसखोरी केली आहे. 18 मार्च, 21 मार्च, 24 मार्च आणि 30 मार्चला चिनी सैन्य भारतीय हद्दीत 8 किलोमीटरपर्यंत आलं होतं. आयटीबीपीच्या अहवालानुसार, लडाखच्या ट्रॅक जंक्शन येथे सकाळी साडे आठ वाजता चिनी हेलिकॉप्टरनं घुसखोरी केली. चिनी हेलिकॉप्टर जवळपास 18 किलोमीटर भारतीय हद्दीत आलं होतं. याचाही आयटीबीपीनं विरोध केला. याबद्दलचा अहवाल आयटीबीपीकडून गृह मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. चिनी सैन्यानं 29 आणि 30 मार्चला अरुणाचल प्रदेशातील असफिला भागात 4 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याची माहिती या अहवालात आहे.22 मार्चला अरुणाचल प्रदेशच्या डिचू भागात सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी चिनी सैनिक 250 मीटरपर्यंत भारतीय हद्दीत आले होते. यावेळी आयटीबीपी आणि चिनी सैन्यात जोरदार खडाजंगी झाली. यानंतर चिनी सैन्य मागे हटलं. भारत-चीन सीमेवरील अतिसंवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये चिनी सैन्याकडून वारंवार घुसखोरी केली जात आहे. भारतीय सैन्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत.  

टॅग्स :chinaचीनinfiltrationघुसखोरीIndian Armyभारतीय जवान