शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

चीनमधील नवीन आजाराने भारताचं वाढलं टेन्शन?, 6 राज्यांना अलर्ट, लोकांना दिला 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 4:06 PM

चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यांतील रुग्णालये, आरोग्य कर्मचाऱ्यांना श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांना तातडीने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चीनमधील मुलांमध्ये वेगाने वाढणाऱ्या श्वसनाच्या आजारामुळे भारत सरकारने 6 राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये राजस्थान, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड, तामिळनाडू आणि हरियाणा यांचा समावेश आहे. चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या राज्यांतील रुग्णालये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांना तातडीने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटक सरकारने आपल्या राज्यातील लोकांना फ्लूबद्दल जागरुक राहण्यास सांगितलं आहे. 

लोकांना खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे, वारंवार हात धुवा, चेहऱ्याला स्पर्श करणं टाळा आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला. स्थानिक रिपोर्ट म्हटलं आहे की, राजस्थान आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यात म्हटलं आहे की परिस्थिती सध्या चिंताजनक नाही. परंतु वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखला पाहिजे. बालरोग विभाग आणि वैद्यकीय विभागांमध्ये पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, असे राजस्थानने म्हटले आहे.

गुजरात, उत्तराखंडमध्ये आरोग्य विभागाचा इशारा

गुजरातचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून कोविड-19 महामारीच्या काळात तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेवा-सुविधा मजबूत केल्या जात आहेत. सरकारने अधिकाऱ्यांना त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्याच वेळी, उत्तराखंडच्या आरोग्य अधिकार्‍यांना श्वसनाच्या आजारांच्या प्रकरणांवर देखरेख वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण उत्तराखंडमधील चमोली, उत्तरकाशी आणि पिथौरागड हे तीन जिल्हे चीनच्या सीमेला लागून आहेत. 

तमिळनाडू देखील पावलं उचलत आहे. तसेच सरकारी आणि खासगी रुग्णालयांनाही तसे आदेश दिले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात आतापर्यंत मुलांमध्ये न्यूमोनियाची एकही घटना आढळली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांना जागरुक राहण्यास सांगण्यात आले आहे. केंद्राने 24 नोव्हेंबर रोजी सांगितले की चीनमधील सध्याच्या इन्फ्लूएंझा परिस्थितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार आहे आणि H9N2 उद्रेक आणि त्या देशातील मुलांमधील श्वसन आजाराच्या प्रकरणांवर लक्ष ठेवत आहे. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन