शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

काश्मीरचं वातावरण दूषित करण्यात चीनचाही हात- मेहबूबा मुफ्ती

By admin | Published: July 15, 2017 2:16 PM

काश्मीरमध्ये ज्या हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामागे बाहेरच्या शक्ती आहेत. आता तर चीननेही हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.15- वर्षभरापासून जम्मू आणि काश्मीरचं वातावरण ढवळून निघालं आहे. काश्मीरमध्ये अशांतता पसरली आहे. या अशांतते मागे फुटीरतावादी आणि पाकिस्तान असल्याचा दावा केला जात आहे. आता यामागे चीनचाही हात असल्याचा दावा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. काश्मीरमध्ये ज्या हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामागे बाहेरच्या शक्ती आहेत. आता तर चीननेही हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे, असा दावा मुफ्ती यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरापासून अशांततेचं वातावरण आहे. तेथिल कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. जम्मू-काश्मीरमधील वातावरण दूषित करण्याचा बाहेरच्या शक्तींचा हात आहे, पण आता चीनचाही त्यात हात आहे, असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला. राजनाथ सिंह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काश्मीरमध्ये आपण कायदा व सुव्यवस्थेची लढाई लढत नाही. जोपर्यंत संपूर्ण देश, राजकीय पक्ष या परिस्थितीत साथ देत नाहीत, तोपर्यंत ही लढाई आपण जिंकू शकत नाही, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत . काश्मीरमधील अस्थिरतेच्या प्रश्नी सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखवली आहे. याचा मला आनंद झाला आहे. सर्व जण काश्मीरच्या समस्यांचा एकत्र सामना करत आहेत, असंही त्या म्हणाल्या आहेत. राज्यात जीएसटीला मंजुरी देण्यात आली त्यावेळी राष्ट्रपतींनी आम्हाला कलम ३७० च्या मुद्द्यावर विशेष लक्ष देणार असल्याचं आश्वासन दिलं होते. कलम ३७० हा मुद्दा आमच्या भावनांशी जोडलेला आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
आणखी वाचा
 

"पाकिस्तानला धडा शिकवणार", शहिदाच्या मुलीचा निर्धार

जम्मू काश्मीर : चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

अमरनाथ यात्रा हल्ला: पीडीपी आमदाराच्या ड्रायव्हरला अटक

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी जवळपास आर्ध्यातास बैठक झाली. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने काय पाऊलं उचलली आहेत, याची माहितीही राजनाथ सिंह यांनी मुफ्ती यांना दिली आहे. तसंच अमरनाथ यात्रेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. सोमवारी अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर यात्रेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना राबविल्या जातं आहेत.