शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

देशाच्या जमिनीवर नव्हे तर सोनिया, राहुल यांच्या मनावर चीनचा कब्जा, भाजपाची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 18:00 IST

लडाखमधील चिनी घुसखोरीवरून काँग्रेसकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानात आता भाजपाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना थेट लक्ष्य केले आहे.

ठळक मुद्देभारताने एक इंचसुद्धा जमीन चीनला दिलेली नाहीइंचभर जमीनसुद्धा कुणी आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाहीचीनने कब्जा केलाच असेल तर तो सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मनावर केला आहे

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेला विवाद जैसे थे आहे. मात्र इकडे देशाच्या राजधानीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सीमावादावरून सुरू असलेल्या आरोपप्रत्यारोपात मात्र रोज नववने अंक सादर होत आहेत. काँग्रेसकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानात आता भाजपाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना थेट लक्ष्य केले आहे.

काँग्रेसकडून देशाच्या जवानांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहेत. देशाचे लष्करप्रमुख लेहच्या दौऱ्यावर असताना सीडब्ल्यूसीची बैठक घेऊन त्यामध्ये लष्कराच्याविरोधात चर्चा केली जात होती, आता तुम्हाला काय लष्करासोबत लढायचे आहे का, असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.  

काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना संबित पात्रा म्हणाले की, भारताने एक इंचसुद्धा जमीन चीनला दिलेली नाही. तसेच इंचभर जमीनसुद्धा कुणी आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही, मात्र दु:खाची बाब म्हणजे काँग्रेस पक्षाने आपली लाज सरेंडर केली आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनीसुद्धा आपल्या देशाच्या जमिनीवर कुणीही कब्जा केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

चीनसोबत भारताचा सीमावाद आहे. मात्र आमच्या एक इंच जमिनीवरसुद्धा चीनने कब्जा केलेला नाही. जर चीनने कब्जा केलाच असेल तर तो सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मनावर केला आहे. २००८ मध्ये झालेल्या करारानंतर त्यांच्या डोक्यावर चीनचा कब्जा झाला आहे, अशी आम्हाला भीती वाटते, अशा टोला संबित पात्रा यांनी लगवला.

आपण रोज सकाळी पाहतोय की, काँग्रेस चीन प्रकरणावरून भारताविरोधात आक्रमक होत आहे, तसेच सरेंडर, सरेंडर बोलत आहे, त्यातून त्यांना आत्मशांती का मिळते, असा सवाल पात्रा यांनी उपस्थित केला. दरम्यान, आज सकाळी जेपी नड्डा यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नड्डा यांच्यावर टीका केली होती.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

"आमची बांधिलकी जनतेशी, ती मातोश्री ते सिल्व्हर ओक अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही"

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसBJPभाजपाSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीSambit Patraसंबित पात्रा