शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"चिनी लोकांनी १९६२ मध्ये भारतावर ‘कथित’ हल्ला केला"; मणिशंकर अय्यर पुन्हा अडकले वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 12:55 IST

मागितली बिनशर्त माफी; भाजपची काँग्रेसवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मंगळवारी १९६२ च्या चिनी आक्रमणाचा उल्लेख करण्यापूर्वी ‘कथित’ हा शब्द वापरला आणि नंतर त्याबद्दल बिनशर्त माफीही मागितली. यावरून भाजपने मात्र काँग्रेसवर जोरदार टीका केली. व्हिडीओनुसार अय्यर एक किस्सा सांगताना म्हणाले, ‘ऑक्टोबर १९६२ मध्ये चिनी लोकांनी भारतावर कथित हल्ला केला.’ नंतर एका संक्षिप्त निवेदनात अय्यर म्हणाले, ‘चिनी हल्ल्यापूर्वी कथित शब्द चुकून वापरल्याबद्दल मी माफी मागतो.’

‘नेहरूज फर्स्ट रिक्रूट’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्यांनी हे भाष्य करून वाद ओढवून घेतला. त्यांच्या या शब्दप्रयोगाने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना सूट देण्यात यावी. काँग्रेसने त्यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले आहे.”

आयएफएस उच्च जातीची सेवा

पूर्वी आयएफएस ही ‘मेकॉलेच्या मुलांची’ उच्च जातीची सेवा मानली जात होती; परंतु आता ती अधिक लोकशाहीवादी बनली आहे. परराष्ट्र सेवेत संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व दिसते आणि मला वाटते की, ही खूप चांगली गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसची ‘भारतविरोधी’ मानसिकता दर्शवते: भाजप

मणिशंकर अय्यर यांचे विधान काँग्रेसची भारतविरोधी मानसिकता दर्शवते आणि लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव होत असताना शत्रुराष्ट्र निवडणुकांत हस्तक्षेप करीत असल्याचे संकेत यावरून मिळतात, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला. अय्यर हे राहुल गांधींच्या संमतीशिवाय असे विधान करू शकणार नाहीत, असे सांगत त्यांनी खरगे यांच्या मौनाबद्दलही टीका केली.

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर