शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

"चिनी लोकांनी १९६२ मध्ये भारतावर ‘कथित’ हल्ला केला"; मणिशंकर अय्यर पुन्हा अडकले वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:54 PM

मागितली बिनशर्त माफी; भाजपची काँग्रेसवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मंगळवारी १९६२ च्या चिनी आक्रमणाचा उल्लेख करण्यापूर्वी ‘कथित’ हा शब्द वापरला आणि नंतर त्याबद्दल बिनशर्त माफीही मागितली. यावरून भाजपने मात्र काँग्रेसवर जोरदार टीका केली. व्हिडीओनुसार अय्यर एक किस्सा सांगताना म्हणाले, ‘ऑक्टोबर १९६२ मध्ये चिनी लोकांनी भारतावर कथित हल्ला केला.’ नंतर एका संक्षिप्त निवेदनात अय्यर म्हणाले, ‘चिनी हल्ल्यापूर्वी कथित शब्द चुकून वापरल्याबद्दल मी माफी मागतो.’

‘नेहरूज फर्स्ट रिक्रूट’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्यांनी हे भाष्य करून वाद ओढवून घेतला. त्यांच्या या शब्दप्रयोगाने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना सूट देण्यात यावी. काँग्रेसने त्यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले आहे.”

आयएफएस उच्च जातीची सेवा

पूर्वी आयएफएस ही ‘मेकॉलेच्या मुलांची’ उच्च जातीची सेवा मानली जात होती; परंतु आता ती अधिक लोकशाहीवादी बनली आहे. परराष्ट्र सेवेत संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व दिसते आणि मला वाटते की, ही खूप चांगली गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसची ‘भारतविरोधी’ मानसिकता दर्शवते: भाजप

मणिशंकर अय्यर यांचे विधान काँग्रेसची भारतविरोधी मानसिकता दर्शवते आणि लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव होत असताना शत्रुराष्ट्र निवडणुकांत हस्तक्षेप करीत असल्याचे संकेत यावरून मिळतात, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला. अय्यर हे राहुल गांधींच्या संमतीशिवाय असे विधान करू शकणार नाहीत, असे सांगत त्यांनी खरगे यांच्या मौनाबद्दलही टीका केली.

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर