शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

भारतीय रेल्वेकडून चिनी कंपनीला कंत्राट; दिल्ली-मेरठ कॉरिडॉरमधील भूयारी मार्ग बांधणार

By देवेश फडके | Updated: January 4, 2021 13:04 IST

दिल्ली ते मेरठ या मार्गादरम्यानच्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या भूयारी मार्गाचे काम चिनी कंपनीला देण्यात आले असून, NCRTC कडून हे कंत्राट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देNCRTC कडून चीनच्या शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीला कंत्राटदिल्ली-गाजियाबाद-मेरठ दरम्यान एकूण ८२ किमीचा कॉरिडोअरसेमी हायस्पीड प्रोजेक्टमधील ५.६ किमी भूयारी मार्ग चिनी कंपनी बांधणार

नवी दिल्ली :दिल्ली ते मेरठ या मार्गादरम्यान तयार करण्यात येणाऱ्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या भूयारी मार्गाचे काम चिनी कंपनीला देण्यात आल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाकडून (NCRTC) शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाकडून देशात प्रथमच रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम उभारण्याचे काम सुरू आहे. भारत-चीन सीमावादावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपनीला देण्यात आलेले कंत्राट रोखण्यात आले होते. आता मात्र पुन्हा एकदा शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीच्या कंत्राटाला मान्यता देण्यात आली आहे. दिल्ली-मेरठ कॉरिडॉर अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीममध्ये दिल्लीतील न्यू अशोक नगर ते गाझियाबाद येथील साहिबाबाद दरम्यान जमिनीखालून जाणारा ५.६ किमीचा मार्ग चिनी कंपनी तयार करणार आहे.     

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कंत्राट देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून परवानगी घेण्यात आली आहे. तसेच कंत्राट देताना सर्व नियमांचे आणि प्रक्रियांचे पालन करण्यात आले आहे. एकूण ८२ किमी अंतराच्या दिल्ली-गाजियाबाद-मेरठ कॉरिडोअरसंबंधी सर्व नागरी कामांचे कंत्राट देण्यात आले असून, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होईल अशा वेगाने बांधकाम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. 

दिल्ली-मेरठ दरम्यान सेमी हायस्पीड प्रकल्प तयार करण्यात येत आहे. एकूण ८२.१५ किमी लांबीच्या प्रकल्पापैकी ६८.०३ किमी उन्नत मार्ग, तर १४.१२ किमीचा भूयारी मार्ग असेल. या भूयारी मार्गापैकी ५.६ किमी मार्गासाठी शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीची बोली सर्वात कमी होती. लडाखमधील सैन्य संघर्षामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव असतानाच हे कंत्राट चिनी कंपनीला देण्यावरून वाद निर्माण झाला होता. 

जून २०२० मध्ये काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीने १ हजार १२६ कोटी रुपयांची बोली लावली होती. तर भारतीय कंपनी असलेल्या 'एल अँड टी'ने १ हजार १७० कोटी रुपयांची आणि टाटा प्रोजेक्ट व एसकेईसी के. जेव्ही या कंपन्यांनी १ हजार ३४६ कोटी रुपयांची बोली लावली होती. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेdelhiदिल्लीmeerut-pcमेरठrailwayरेल्वेNCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र