शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

चिनम्माचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगणार ?

By admin | Published: February 07, 2017 8:53 AM

अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्हीके शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पण...

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 7 - अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्हीके शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पण त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या न्यायालयीन खटल्यांमुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. शशिकला यांच्या विरोधातील बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवडयात निकाल सुनावणार आहे. 
 
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता आणि शशिकला यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या आरोपातून सुटका झाली होती. या सुटकेला आव्हान देणा-या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. निकाल विरुद्ध लागला तर, त्यांच्या मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि राज्यात राजकीय अस्थिरताही निर्माण होईल. 
 
66.65 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता, शिशकला, व्हीएन सुधाकरन आणि ईलावारासी हे चौघे आरोपी होते. या चौघांची न्यायालयाने सुटका केली पण या सुटकेला आव्हान देण्यात आले. मागच्यावर्षीय 7 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर रावही नवी दिल्लीहून थेट मुंबईला आले आहेत. ते तूर्तास तामिळनाडूला जाण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे चिनाम्मा म्हणजेच शशिकला यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला विलंब लागू शकतो.  
 
आताच जयललिता यांच्या मृत्यूबद्दल खुलासा का ? 
शशिकला यांच्या शपथविधीपूर्वी अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पत्रकारपरिषद घेऊन जयललिता यांचा मृत्यू रक्तातील संसर्गामुळे झाल्याचे सांगितले. जयललिता यांच्या मृत्यूसंबंधी अनेकांना संशय असून, विविध अफवा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाने पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. पण जयललिता यांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी हा खुलासा का केला ? त्याची आता काय गरज निर्माण झाली ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.