शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

४०० मुली गायब, वाचायचं असेल तर लवकर लग्न करा; भाजपा नेत्याचा 'केरल स्टोरी'वाला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:19 IST

२०२३ मध्ये द केरल स्टोरी नावाचा बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात केरळातील युवतींची कहाणी समोर आणली होती ज्यांना बळजबरीनं धर्मांतरण करण्यास भाग पाडलं जाते.

ख्रिश्चन समाजातील आई वडिलांनी त्यांच्या मुलींचं लग्न वयाच्या २४ वर्षाआधीच करण्याचा अजब सल्ला भारतीय जनता पार्टीच्या केरळमधील स्थानिक नेत्याने दिला आहे. लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी समाजाला हा इशारा दिला. केरळमधील भाजपा नेते पीसी जॉर्ज हे याआधीही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते त्यातून जॉर्ज यांच्या अटकेचीही मागणीही करण्यात आली होती.

मिडिया रिपोर्टनुसार, पूंजार येथील माजी आमदार जॉर्ज यांनी ख्रिश्चन समाजातील लोकांना त्यांच्या घरातील मुलींची लग्न २४ वर्ष होण्याआधी करून टाकावीत असं म्हटलं. पाला येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, मीनाचिल तालुक्यात जवळपास ४०० युवती लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. त्यातील केवळ ४१ युवती परत आल्यात. ख्रिश्चन समाजातील पालक त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी वयाच्या २५ वर्षापर्यंत वाट पाहतायेत त्यामुळे हे घडतंय असा दावा त्यांनी केला. 

तर मुलींची लग्न २४ व्या वयाआधी करावीत. त्या लग्नानंतरही शिक्षण घेऊ शकतात असा सल्ला पीसी जॉर्ज यांनी पालकांना दिला आहे. मुलींची लग्न वयाच्या २५, ३० पर्यंत का केली जात नाहीत, का त्यांना घरात बसवले जाते? २५ वर्षाची एक मुलगी काल बेपत्ता झाली. रात्री ९.३० वाजता ती गायब झाली असं सांगत २५ वयापर्यंत मुलींचं लग्न न झाल्यास त्यासाठी वडिलांना जबाबदार धरलं पाहिजे. त्यांनी तिचं लग्न का केले नाही, हा असा मुद्दा आहे ज्यावर बोलले पाहिजे असं पीसी जॉर्ज यांनी म्हटलं. जॉर्ज यांच्या विधानावरून युवक काँग्रेसने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

'द केरल स्टोरी' सिनेमा सापडला होता वादात

दरम्यान, २०२३ मध्ये द केरल स्टोरी नावाचा बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात केरळातील युवतींची कहाणी समोर आणली होती ज्यांना बळजबरीनं धर्मांतरण करण्यास भाग पाडलं जाते. या चित्रपटावरून बराच वादंग झाला होता. या सिनेमाविरोधात सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल झाली होती. 

टॅग्स :BJPभाजपाLove Jihadलव्ह जिहाद