शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:02 IST

घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. याच दरम्यान एक वाईट बातमी आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला

राजस्थानमधील चुरू येथे एक भीषण अपघात झाला आहे. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. याच दरम्यान एक वाईट बातमी आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. हमीरवास येथील २६ वर्षीय दयाप्त हा आपल्या मावशीच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी मावशीच्या घरी जात होता, मात्र त्याआधीच रस्त्यात त्याचा अपघात झाला. या घटनेने कुटुंबीयांचा आनंद हिरावून घेतला. 

दयाप्त यांचं अवघ्या सात महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला खूप मोठा धक्का बसला आहे. ठिमोलीचे सरपंच संजय प्रजापत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठिमोली येथील रहिवासी असलेले खेमचंद हे सौदी अरेबियाहून आले होते आणि रामपुरा येथील भाच्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बसने थेट चुरूला उतरले होते. 

हमीरवास येथील रहिवासी असलेला दयाप्त हा आपल्या मावशीच्या मुलाच्या लग्नासाठी आपल्या पत्नीसह रामपुरा गावात आला होता. तो नंतर आपल्या मामाला आणायला बाईक घेऊन आला होता. त्याच दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने पाठीमागून बाईकला धडक दिली आणि अपघातात 38 वर्षीय खेमचंद आणि त्यांचा 26 वर्षीय भाचा दयाप्त जखमी झाले. 

जखमींना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात आणण्यात आले, तेथे उपचारादरम्यान दयाप्त याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे अधिकारीही दाखल झाले व त्यांनी अपघाताची माहिती घेतली. ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी एप्रिल महिन्यात हमीरवास रहिवासी दयाप्त याचं लग्न झालं होतं, त्याने प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघेही पती-पत्नी चुरू येथे भाड्याच्या घरात राहत होते आणि दयाप्त चुरू येथील एका रिटेल मार्केटमध्ये काम करत होते. नवरा-बायको दोघेही हसत-खेळत आयुष्य जगत होते, पण त्यांच्या आयुष्यात आता धक्कादायक घटना घडली आहे.  

टॅग्स :marriageलग्नAccidentअपघातRajasthanराजस्थान