शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

नागरिकांचे हाल; दूरवरून आणले पाणी

By admin | Published: March 11, 2016 10:26 PM

जळगाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचा पाणीसाठा संपून त्यांना पिण्यासाठी देखील पाणी उरले नाही. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून, विहीरींवरून पाणी भरून आणावे लागले. नेहरू नगर परिसरातील काही नागरिकांनी तर आंघोळीसाठी थेट मेहरूण तलावावर जाऊन पाण्याचे ड्रम भरून आणले. तर पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांचा शोध घेत हिंडावे लागले. अनेक नागरिकांनी तर मिनरल वॉटरचे जार विकत आणून वेळ निभावून नेली. स्नेहल कॉलनी, नंदनवननगर परिसरातही चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल्

जळगाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांचा पाणीसाठा संपून त्यांना पिण्यासाठी देखील पाणी उरले नाही. त्यामुळे नागरिकांना हातपंपावरून, विहीरींवरून पाणी भरून आणावे लागले. नेहरू नगर परिसरातील काही नागरिकांनी तर आंघोळीसाठी थेट मेहरूण तलावावर जाऊन पाण्याचे ड्रम भरून आणले. तर पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांचा शोध घेत हिंडावे लागले. अनेक नागरिकांनी तर मिनरल वॉटरचे जार विकत आणून वेळ निभावून नेली. स्नेहल कॉलनी, नंदनवननगर परिसरातही चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

टँकरद्वारे पाणी पुरवण्याची तसदी नाही
मनपाच्या जलवाहिनीची गळती दुरूस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा खंडित करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. आधीच दोन दिवस पाणीपुरवठा न झालेल्या भागात दुरुस्तीमुळे आणखी एक-दोन दिवस उशीराने म्हणजे तब्बल चार-पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीतही मनपाकडून नागरिकांचे हाल टाळण्यासाठी कोणतीही पर्यायी पाणपुरवठा व्यवस्था केली जात नाही. टँकरद्वारे पाणी पुरवण्याची तसदी देखील मनपाकडून घेतली जात नाही. तर नगरसेवकही सोयीस्करपणे प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे होतात. त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतो.