शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

“कायदा-सुव्यवस्था राखणे सरकारचे काम, आमचे नाही”; मणिपूर हिंसाचारावर CJIचंद्रचूड यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 7:14 PM

CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा वापर करू नका, असा सांगत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चांगलेच फटकारले.

CJI D. Y. Chandrachud on Manipur Violence: गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तेथील इंटरनेट व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. 

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भातील काही याचिकांवर सुनावणी करताना सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम नाही. हे काम निवडून आलेल्या सरकारचे आहे. ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी कुकी गटांतर्फे युक्तिवाद करताना वाढत्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. ईशान्येकडील राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

याचा वापर समस्यांना वाढवण्यासाठी व्यासपीठ म्हणून करू इच्छित नाही

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणी करताना, सुरक्षा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनात न्यायालयाच्या मर्यादा लक्षात घेऊन या समस्येकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. या कार्यवाहीचा उपयोग हिंसाचार आणि इतर समस्यांना वाढवण्यासाठी व्यासपीठ म्हणून करू इच्छित नाही. सर्वोच्च न्यायालय सुरक्षा किंवा कायदा व सुव्यवस्था चालवत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. ही एक मानवी समस्या आहे आणि त्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. या बाबी लक्षात घेऊन या प्रकरणावर सुनावणी होणार आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचाराला भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. राज्य सरकार हिंसाचारात सामील असलेल्या सशस्त्र गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप कॉलिन गोन्साल्विस यांनी केला. यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराची जाणीव ठेवली पाहिजे. गोन्साल्विस यांना पुढील सुनावणीच्या तारखेला अधिक चांगल्या सूचना सादर कराव्यात, असे CJI चंद्रचूड यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडManipur Violenceमणिपूर हिंसाचार