शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

स्वच्छतेची ‘लक्ष्य’पूर्र्ती!

By admin | Published: October 02, 2015 4:24 AM

पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियान’ या पंचवार्षिक योजनेचे पहिल्या वर्षीचे शौचालय बांधणीचे नियोजित उद्दिष्टाहून बरीच अधिक मजल मारण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला.

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियान’ या पंचवार्षिक योजनेचे पहिल्या वर्षीचे शौचालय बांधणीचे वेळेपूर्वीच ओलांडून नियोजित उद्दिष्टाहून बरीच अधिक मजल मारण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने गुरुवारी केला. मात्र ज्या प्रमाणात गवगवा झाला ते पाहता या मोहिमेचा प्रभाव कुठे दिसलाच नाही. स्वातंत्र्यानंतरचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी नागरी प्रकल्प अशी प्रसिद्धी मिळालेल्या या योजनेला २०१९पर्यंत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेने मोठी मजल गाठावी लागेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.पंतप्रधान मोदींनी स्वत: हातात झाडू घेऊन गतवर्षी गांधी जयंतीला स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. या अभियानांतर्गत केंद्र सरकारने ग्रामीण भागात ६0 लाख नवी शौचालये बांधण्याचे लक्ष्य ठरवले होते. प्रत्यक्षात वर्ष संपण्याआधीच ८१.४१ लाख शौचालये बांधून तयार आहेत. देशात सध्या दररोज ५१ हजार नवी शौचालये तयार होत आहेत, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा व मलनि:सारण (पेयजल व स्वच्छता) मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बिहार, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरयाणाने या योजनेत लक्षणीय प्रगती साधली आहे; तर उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचलसारखी काही राज्ये या आघाडीवर निर्धारित लक्ष्यापेक्षा मागे आहेत, असे मंत्रालयाची आकडेवारी सांगते.समस्यांचा डोंगरखुल्या जागेवर शौचाच्या जागतिक प्रमाणात भारताचा वाटा सर्वाधिक ६० टक्के आहे. प्रत्यक्षात हागणदारीमुक्ती गावांचे उद्दिष्ट गाठताना समस्यांचा डोंगर पार करावा लागणार असेच चित्र दिसत आहे. अपुरा निधी, जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या क्षमतेचा अभाव, निष्प्रभ ठरलेल्या जनजागृती मोहिमा, शौचालयांचा वापर करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यात आलेले अपयशही या घटकांत समाविष्ट आहे. शौचालयांच्या बांधणीत सरकारला अपेक्षित असलेला प्रतिसाद खासगी क्षेत्राकडून न मिळणे हेही महत्त्वाचे कारण आहे.यंदाच्या गांधी जयंतीच्या कार्यक्रमात गतवर्षासारखा कोणताही गाजावाजा, थाटमाट अथवा बडेजाव नाही. तमाम ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे आयोजन करावे, लोकांमधे स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करावी असे मंत्रालयाने एका परिपत्रकाद्वारे कळवले आहे.सातत्यपूर्ण जनजागृती मोहीम राबवत शौचालय वापराची संस्कृती रुजवावी लागेल; तरच स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी समुदायाला हा कार्यक्रम यशस्वी करता येईल.- एम. रामचंद्रन, माजी केंद्रीय नगर विकास सचिव