शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

रस्ता मोकळा करा, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात स्थानिक आक्रमक; दिल्लीच्या सीमेवर मोठा गोंधळ

By बाळकृष्ण परब | Updated: January 28, 2021 16:35 IST

Farmer Protest : ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरू केला आहे.

ठळक मुद्देसिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी रस्ता अडवून करण्यात येत असलेल्या आंदोलनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा स्थानिकांनी केला दावा आंदोलकांनी शुक्रवारपर्यंत जागा रिकामी केली नाही तर आम्ही येथे हजारोंच्या संख्येने पुन्हा येऊ, असा दिला इशारा

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरू केला आहे. दिल्ली हरियाणा सीमेवर (सिंघू बॉर्डर) आज सकाळपासून स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात जमण्यास सुरुवात केली आहे. तसेच आंदोलकांनी येथील रस्ता लवकरात लवकर मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू होती. रस्ता अडवून करण्यात येत असलेल्या आंदोलनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. आंदोलकांनी शुक्रवारपर्यंत जागा रिकामी केली नाही तर आम्ही येथे हजारोंच्या संख्येने पुन्हा येऊ, असा इशारा दिला आहे. २६ जानेवारीला जे घडले ते सहन करता येण्याजोगे नाही. आतापर्यंत आम्ही यांना शेतकरी समजत होतो. मात्र आता सत्य परिस्थिती आमच्यासमोर आली आहे, असे स्थानिकांनी म्हटले आहे.

सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये स्थानिक दुकानदारांचाही समावेश आहे. सिंघू बॉर्डर रिकामी करा, अशी मागणी करत त्यांनी आंदोलन केले आहे. त्यांनी तिरंगाही सोबत घेतला आहे. सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. या ठिकाणची वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे दुकानदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान, बुधवारी रेवाडीमध्ये अनेक गावांतील लोक पंचायतींचे आयोजन केल्यानंतर आंदोलकांजवळ पोहोचले होते. आंदोलक आणि स्थानिक आमने-सामने आल्याने पोलीसही चिंतेत पडले होते. मात्र स्थानिकांचे पारडे जड दिसू लागल्यानंतर रस्ता अडवून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला आहे.२६ जानेवारी रोजी आयोजित ट्रॅक्टर रॅलीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शेकतरी आंदोलनाप्रति स्थानिक तसेच सर्वसामान्यांमध्ये असलेली सहानूभुती कमी झाली होती. त्यामुळे आता स्थानिक रहिवाशांकडूनही दिल्लीच्या सीमेवर रस्ता अडवून आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना विरोध होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीPoliticsराजकारण