शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

हवामान बदलामुळे जगभरात वाढणार गरिबी; जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 05:15 IST

जागतिक अर्थव्यवस्थेला २०५० पर्यंत दरवर्षी ३८ लाख कोटी डॉलर्सचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हवामान बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे पुढील २५ वर्षांत सुमारे १९ टक्के उत्पन्न कमी होण्याची अपेक्षा आहे. या समस्येसाठी कमीत कमी जबाबदार असलेले देश आणि हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी किमान संसाधने आहेत, असे देश यांनाही फटका बसू शकतो.

जर्मनीच्या ‘पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च’मधील (पीआयके) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील सरासरी उत्पन्न २०५०मध्ये २२ टक्क्यांनी कमी होईल, असे म्हटले आहे. 

प्रगत देशांचीही सुटका नाहीया विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, हवामान बदलामुळे येत्या २५ वर्षांत जगभरातील जवळजवळ सर्वच देशांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल, त्यात जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका यांसारख्या अत्यंत विकसित देशांचाही समावेश आहे, असे शास्त्रज्ञ लिओनी वेन्झ यांनी सांगितले.

गरीब देशांना फटका जास्त- हवामान बदलासाठी सर्वांत कमी जबाबदार असलेल्या देशांना उच्च उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा ६० टक्के जास्त आणि उत्सर्जन जास्त असलेल्या देशांपेक्षा ४० टक्के जास्त उत्पन्नाचा तोटा होणार आहे. - हवामान बदलांना आळा न घातल्यास शतकाच्या उत्तरार्धात २१०० पर्यंत आर्थिक नुकसान जागतिक सरासरीच्या ६० टक्क्यांपर्यंत मोठे होईल, असे वेन्झ म्हणाले.

खर्चापेक्षा नुकसान जास्तअंदाजित नुकसान प्रचंड आहे आणि तापमान वाढ २ अंशच्या खाली ठेवण्यासाठी पुरेसे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा सहापट जास्त आहे. हे नुकसान वाढत्या सरासरी तापमानामुळे होते. तथापि, संशोधकांनी पाऊस आणि वादळ यांसारख्या इतर घटकांचादेखील विचार केला, तेव्हा अंदाजित आर्थिक नुकसान सुमारे ५० टक्क्यांनी वाढले. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था