शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

पाकच्या गोळीबारामुळे सीमाभागातील 200 शाळा बंद

By admin | Published: November 02, 2016 2:38 PM

पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या सीमाभागातील 200 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
 जम्मू, दि. 2 -  पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या सीमाभागातील 200 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 
भारताने नियंत्रण रेषा पार केल्यापासून सीमाभागात तणावाचे वातावरण असून, पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे.  या गोळीबारात काही भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीमाभागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जम्मू विभागातील 174 तर सांबा विभागातील 45 शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. असे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले. " आंतरराष्ट्रीय सरहद्द आणि नियंत्रण रेषेवर  सुरू असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुढील आदेश येईपर्यंत या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत," जम्मूच्या उपायुक्त सिमरन दीप सिंह म्हणाल्या.
हे आदेश सर्व शासकीय आणि खाजगी शाळांना बंधनकारक असेल. नियंत्रण रेषेजवळ असलेल्या खौर, जौरियान, मार्ह, आर.एस.पुरा, अरनिया, सतवाती (मंडाल, माखवाल, लाल्याल), अखनूर, बिस्हानाह आणि मिरान साहिब या भागातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. 
(काश्मिरात शाळा जाळल्या) 
(काश्मीरमधील शाळा सुरू करा) 
 
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही काळापासून निर्माणा झालेल्या अशांततेमुळे काश्मीर खोऱ्यातील शाळा बंद आहेत. तसेच खोऱ्यामध्ये 27 शाळा जाळण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत.