शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

CM Eknath Shinde on OBC Reservation: “ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो”; एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:55 IST

CM Eknath Shinde on OBC Reservation: अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथविधी झाल्यानंतर दिल्ली दौरा केला. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. मात्र, यासह सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली. यानंतर या दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सदर भेट असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाने पटापट पावले उचलत, यापैकी १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. मात्र, याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव धेतली. शिवसेना आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाला दिलासा देत यावरील सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली. यानंतर राज्यातील सत्ता संघर्ष पराकोटीला गेला आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची नामुष्की ओढावली. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यातील ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहतांची भेट याचसंदर्भात असल्याबाबत चर्चा सुरू होती. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत उत्तर दिले. 

ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो

ओबीसी आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. यासंदर्भात तुषार मेहता यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. यासाठीच तुषार मेहतांनी प्रतिनिधित्व करावे, अशी विनंती करण्यासाठी आम्ही दोघेही त्यांना भेटलो, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच ओबीसी समाजाला न्याय मिळावा, हीच आमची आधीपासूनची भूमिका होती आणि आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, हीच आमची इच्छा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूरस्थिती आहे. अशा परिस्थितीत निवडणुका घेणे, त्या यंत्रणा तिथे लावणे, याची मोठी तयारी करावी लागते. निवडणुकांचे वातावरण तयार व्हावे लागते. अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे. राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती लक्षात घेता, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करणार आहोत, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.  

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस