शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

CM नितीश कुमारांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:42 IST

आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो

नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंतर, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात नितीश यांनीही जाहीर माफी मागितली आहे. मात्र, आता राष्ट्रीय महिला आयोगाने नितीश कुमार यांच्या वक्तव्याची दखल घेत थेट विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आयोगाने केली आहे.  

आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो.", असे म्हणत त्यांनी विधानसभेतील विधानावर माफी मागितली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन आता राजकारण तापलं आहे. भाजपाच्या महिला नेत्यांनी नितीश कुमार यांची गाडी अडवून नारेबाजी केली तर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसींनीही नितीश कुमार यांच्या विधानावरुन टीका केली आहे. आता, महिला आयोगाने या विधानाची दखल घेतली.  राष्ट्रीय महिला आयोगाने बिहार विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना पत्र लिहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विधानसभेतील विधानाची तपासणी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोग १९९० च्या कलम १० अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे पत्र लिहून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, नितीश कुमार यांच्या विधानाचा निषेधही केला आहे.  

काय म्हणाले होते नितीश - 

बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, "बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल."

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारWomenमहिलाChief Ministerमुख्यमंत्री