शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

CM से PM तक, उत्तरप्रदेशची दंगल कोण जिंकणार ?

By admin | Published: January 04, 2017 2:18 PM

निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींना अधिक धार चढेल.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 4 - निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींना अधिक धार चढेल. पाच राज्यांपैकी सर्वांचेच लक्ष असेल ते उत्तरप्रदेशच्या निवडणूक निकालांवर. कारण उत्तरप्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य असून तिथला सत्ताधारी केंद्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावतो असा आजवरचा इतिहास आहे. 
 
उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा असून, खासदारकीच्या 80 जागा आहेत. विद्यमान लोकसभेमध्ये भाजपाचे एक चर्तुथांश खासदार एकटया उत्तरप्रदेशातील आहेत. 11 फेब्रुवारीपासून उत्तरप्रदेशमध्ये मतदानाची दंगल सुरु होणार असून, 8 मार्चला मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडेल. 
 
अजून दोनवर्षांनी 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणूका होतील. त्यावेळी उत्तरप्रदेशची सत्ता हाती असेल तर लोकसभेत खासदारांची संख्या वाढवता येऊ शकते. त्यामुळे भाजपाने उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी संपूर्ण जोर लावला आहे. 'सीएम से पीएम तक' ही घोषणाही वापरली जाऊ शकते. 
 
पंतप्रधान बनण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2014 लोकसभा निवडणूकीसाठी त्यांनी उत्तरप्रदेशातल्या बनारस लोकसभा मतदारसंघाची निवड केली. त्यावरुन उत्तरप्रदेशचे महत्व लक्षात येते. 2017 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यावेळीही उत्तरप्रदेशातील मते निर्णायक राहतील. 
 
आघाडीच्या राजकारणातून मुक्ती मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे नेहमीच यूपी जिंकण्याला प्राधान्य असते. उत्तरप्रदेशातील जय-पराजय केंद्रातील राजकारणावर निश्चिच प्रभाव टाकतील. जर भाजपाचा विजय झाला तर, 2019 लोकसभेसाठी त्यांचा आत्मविश्वास बळावेल. 
 
काँग्रेस, सपा, बसपा यांना विजयामुळे उभारी आणि आत्मविश्वास मिळू शकतो तसेच प्रादेशिक पक्षांचा आवाज देखील दिल्लीत बळकट होईल.  1990 पासून सपा आणि बसपा या दोन पक्षांनी उत्तरप्रदेशच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीचा इथला कल पाहता इथल्या मतदारांनी एकदा बसपाला आणि एकदा सपाला पूर्ण बहुमताने सत्ता दिली आहे. 
 
2014 लोकसभा निवडणुकीच्यावेळीही उत्तरप्रदेशचा मतदार भाजपाच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला. त्यामुळे भाजपाला 80 पैकी 71 जागांवर विजयाची पताका फडकवता आली. मतदानाचा असाच ट्रेंड कायम राहिला तर, कदाचित भाजपा आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांची इथे पूर्ण बहुमताची सत्ता येऊ शकते.