शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

"तेलंगणासोबत भेदभाव...", पद्म पुरस्कारांबाबत मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:02 IST

Revanth Reddy : पद्म पुरस्कारांबाबत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची नाराजी समोर आली आहे. त्यांनी आपल्या राज्यावर भेदभाव केल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. केंद्र सरकारने शनिवारी १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये २३ महिलांचा समावेश आहे. तर मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या १३ व्यक्ती आहेत. दरम्यान, या पद्म पुरस्कारांबाबत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची नाराजी समोर आली आहे. त्यांनी आपल्या राज्यावर भेदभाव केल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला आहे.

राज्य सरकारने पद्म पुरस्कारांसाठी दिलेल्या नावांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शनिवारी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच, यासंदर्भात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचा विचार करत असल्याचेही सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, हा 'भेदभाव' तेलंगणातील लोकांचा अपमान आहे.

दरम्यान, पद्म पुरस्कार देण्यासंदर्भात तेलंगणा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अनेक व्यक्तींची नावे पाठवली होती. शिफारस केलेल्या नावांमध्ये लोक गायक आणि गीतकार गद्दार (पद्मविभूषण), शिक्षणतज्ज्ञ चुक्का रमैया (पद्मभूषण), कवी अँडी श्री (पद्मभूषण), कवी आणि गायिका गोराती वेंकन्ना (पद्मश्री) आणि कवी आणि इतिहासकार जयधीर तिरुमला यांचा समावेश आहे. मात्र, केंद्राने त्यांचा विचार केला नाही, हे तेलंगणाच्या ४ कोटी लोकांचा 'अपमान' असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांसाठी १३९ लोकांची निवड केली असली, तरी तेलंगणातील शिफारस केलेल्या पाच जणांची निवड करण्यात आली नाही, त्याबद्दल मु्ख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ज्यामध्ये अभिनेता बालाकृष्ण, डॉक्टर नागेश्वर रेड्डी आणि मंदा कृष्णा मडिगा यांचा समावेश आहे. रेवंत रेड्डी म्हणाले की, पुरस्कारांसाठी त्यांची निवड ही त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पद्म पुरस्काराची घोषणाकेंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. हे पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर या तीन मान्यवरांसह १९ जणांना पद्मभूषण पुरस्कार तर मारूती चितमपल्ली, विलास डांगरे, चैतराम पवार यांच्यासह देशभरातील ३० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.  

टॅग्स :Telanganaतेलंगणाpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार