शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून बंगालपर्यंत हिंसाचार, यूपीत शांतता; CM योगींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:29 AM

योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही.

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून ते पश्चिम बंगालपर्यंत देशातील अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. पण सांप्रदायिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणवल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातून मात्र, अशी एकही घटना समोर आली नाही. यासंदर्भात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही. दंगली तर दूरचा विषय, उत्तर प्रदेशात शांतता आहे. येथे गुंडगिरी आणि अराजकतेला कुठलेही स्थान नाही.

लखनौ येथे मंगळवारी सायंकाळी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "परवा रामनवमी होती.  उत्तर प्रदेशात एकूण 25 कोटी लोक राहतात. येथे 800 ठिकाणी रामनवमीनिमित्त शोभायात्रा अथवा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. याच बरोबर सध्या रमजानचा महिनाही सुरू आहे. यामुळे रोजा इफ्तारचे कार्यक्रमही होतच असतील. पण, दंगलींचा विषय तर सोडच, कुठे साधे तू-तू-मी-मीही झाले नाही."

योगी पुढे म्हणाले, ''यवरून उत्तर प्रदेश आता विकासाचा विचार करत असल्याचे दिसून येते. आता गुंडगिरी, अराजकता आणि अफवांना कुठलेही स्थान नाही. हे उत्तर प्रदेशने रामनवमीला, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामांच्या जयंतीनिमित्त सिद्ध केले आहे.'' तत्पूर्वी, देशातील गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांत अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Navamiराम नवमी