शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कोळसा खाण कोेसळली; दहा मजुरांचा मृत्यू

By admin | Published: December 31, 2016 2:08 AM

झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात कोळसा खाण कोसळून ११ मजुरांचा मृत्यू झाला असून, त्यात आणखी किमान ४0 ते ५0 जण ३00 फूट खाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांची

- एस. पी. सिन्हा,  गोड्डा झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात कोळसा खाण कोसळून ११ मजुरांचा मृत्यू झाला असून, त्यात आणखी किमान ४0 ते ५0 जण ३00 फूट खाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इस्टर्न कोलफिल्ड कंपनीच्या व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी रात्री कामाच्या वेळी अचानक खाण कोसळली आणि क्षणार्धात ३०० फूट खाणीचे मैदानात रूपांतर झाले. गोड्डा जिल्ह्याच्या ललमटिया भागात भोडाय कोल माइन्स साइटवर गुरुवारी रात्री काही भाग ढासळला. ढिगाऱ्यातून काढलेल्या दहापैकी पाच मृतदेहांची ओळख पटली आहे. यातील एक जण झारखंडचा, तीन बिहारचे, तर एक जण उत्तर प्रदेशचा मजूर आहे. या खाणीत २० व्होल्वो, एक डोजर, सहा पोकलेन व्होल्वो, एक बोलेरो फसली आहेत. या दुर्घटनेनंतर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मदतकार्य सुरू होण्यास उशीर झाला. या खाणीत दबले गेलेले सर्व मजूर एका खासगी कंपनीचे आहेत. ईसीएलने खासगी कंपनीला उत्खननाचे काम सोपवले आहे. (वृत्तसंस्था)क्षणार्धात सपाटअसे सांगण्यात येत आहे की, गुरुवारी रात्री कामाच्या वेळी अचानक खाण ढासळली आणि क्षणार्धात ३०० फूट खाण सपाट मैदानात परिवर्तित झाली. या घटनेनंतर कर्मचारी आणि मजुरांच्या कुटुंबातून संताप व्यक्त केला जात आहे. इशाऱ्याकडे दुर्लक्ष : तीन दिवसांपूर्वीच या खाणीत उत्खननाचे काम सुरू करण्यात आले होते. तत्पूर्वी, ईसीएलकडून या ठिकाणी पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा उत्खननास परवानगी देण्यात आली. एका इंजिनिअरने या खाणीत भेगा पडल्याची सूचना दिली होती; पण त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. कंपनीने घेतला नव्हता धडारात्री हेमनारायण यादव या कामगाराला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंदुआ गावातील वाहन चालक शहादत अंसारी यांनी सांगितले की, खाणीत जिथे ढिगारे कोसळले आहेत तिथे ड्रील मशीनही कोसळली आहे. कंपनीने यापूर्वीच्या घटनेतून धडा घेतला नाही आणि तसेच काम सुरू ठेवले.मृतांच्या नातेवाइकांना १२ लाखांची मदतया दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १२ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. झारखंड सरकारकडून दोन लाख रुपये, तर महालक्ष्मी कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख आणि ईसीएल कंपनीकडून पाच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. जखमींना राज्य सरकारकडून २५ हजार रुपये मिळणार आहेत. - केंद्रीय ऊर्जा आणि कोळसामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, मदतकार्य सुरू आहे. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर गोयल यांनी गोड्डाच्या उपायुक्तांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. मुख्यमंत्री रघुवर दास यांनी घटनास्थळी पाहणी केली. तपासात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. - झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, मी ललमटियाच्या पीडितांशी चर्चा केली. येथे ७० च्या आसपास लोक फसले आहेत. सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशी परिस्थिती राज्यात २० ते २५ जागेवर आहे. या ठिकाणीही कधीही अशी दुर्घटना होऊ शकते.