शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोठं संकट! पुढच्या आठवड्यात बत्ती गुल? देश अंधारात बुडण्याची भीती; चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:55 IST

देशातील निम्म्या वीज प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकात कोळसा शिल्लक

नवी दिल्ली: कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील काम ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये कोळशाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देशातील बराचसा भाग अंधारात बुडून जाण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय वीज प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, देशात कोळशापासून वीज निर्मिती करणारे १३५ प्रकल्प आहेत. यातील १६ प्रकल्पांमधील कोळशाचा साठा पूर्णपणे संपला आहे. तर जवळपास निम्म्या प्रकल्पांमध्ये (७२ प्रकल्पांमध्ये) केवळ ३ दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये एक आठवडा पुरेल इतका साठा बाकी आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण वीजेपैकी ७० टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते. कोळशापासून निर्माण होणारी उर्जा स्वस्त असते. त्यामुळे भारतात याच उर्जेचा वापर होतो.

वीज प्रकल्पात कोळशाची टंचाई; नेमकं कारण काय?कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थचक्र सुरळीत होऊ लागलं आहे. औद्योगिक उर्जेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोळशाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये खूप मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम कोळशाच्या आयातीवर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर वाढले आहेत. त्यामुळे वीज प्रकल्पांनी आयात कमी केली आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील कोळसा खाणींवर दिसू लागला आहे. कोळसा खाणींवरील दबाव वाढला आहे. देशातील कोळशाची किंमत कोल इंडियाकडून निश्चित केली जाते. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाची किंमत वाढली आहे. पण कोल इंडियानं देशातील कोळशाचा दर फारसा वाढवलेला नाही. कोळशाची किंमत वाढल्यास त्याचा थेट परिणाम वीजेच्या दरांवर आणि पर्यायानं अन्य उत्पादनांवर होईल.

टॅग्स :electricityवीजCoal Shortageकोळसा संकटCentral Governmentकेंद्र सरकार