शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विद्यार्थिनींनी काय परिधान करावे, याचे नियम कॉलेजांनी लादू नये - सर्वोच्च न्यायालय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 07:36 IST

मुंबईतील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीला नोटीस, १८ नोव्हेंबरपर्यंत मागितले उत्तर

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कॅम्पसमध्ये हिजाब, बुरखा, टोपी आणि नकाब यांवर बंदी घालणाऱ्या मुंबईतील महाविद्यालयाच्या परिपत्रकाला अंशत: स्थगिती दिली. विद्यार्थिनींना त्यांनी काय परिधान करावे हे निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, शैक्षणिक संस्था त्यांच्यावर त्यांच्या निवडीची सक्ती करू शकत नाहीत, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे कॉलेज चालवणाऱ्या चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीला नोटीस बजावली आणि १८ नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागितले. 

कॅम्पसमध्ये हिजाब, बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याच्या कॉलेजच्या निर्णयाला कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस आणि अधिवक्ता अबीहा झैदी हे जैनब अब्दुल कय्युम यांच्यासह याचिकाकर्त्यांतर्फे उपस्थित होते. बंदीमुळे विद्यार्थी वर्गांना उपस्थित राहू शकले नाहीत, असे निवेदन त्यांनी केले.

नावातून धर्म कळत नाही का?विद्यार्थ्यांच्या धार्मिक श्रद्धा उघड होऊ नयेत असा हेतू असेल, तर कॉलेजने ‘टिळा’ आणि ‘टिकली’वर बंदी का घातली नाही, विद्यार्थ्यांची नावे त्यांची धार्मिक ओळख प्रकट करणार नाहीत का?, असे सवाल न्यायालयाने केले.

भगवी शाल घालणाऱ्यांचे काय?हे महाविद्यालय २००८ पासून अस्तित्वात आहे. सरकारी मदतीशिवाय कार्यरत आहे, असे सांगत दिवाण म्हणाल्या की, जर संस्था विशिष्ट विद्यार्थ्यांना हिजाब आणि नकाब परिधान करण्यास परवानगी देत असेल, तर इतरांना भगवी शाल व त्यांच्या प्रतीकात्मक पोशाखात येण्यापासून ते कसे रोखेल? त्यावर न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देण्याचा मुद्दा मोठ्या खंडपीठासमोर विचाराधीन आहे.

हिजाब, बुरखा, टोपी, नकाब बंदीच्या कॉलेजच्या नियमाला कोर्टाची स्थगिती

विद्यार्थिनींचे स्वातंत्र्य कुठे आहे?nसुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कुमार यांनी सोसायटीतर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील माधवी दिवाण यांना विचारले की, हिजाब बंदीचे परिपत्रक जारी करून महाविद्यालय विद्यार्थिनींचे सक्षमीकरण कसे करणार?, तुम्ही महिलांना काय परिधान करावे हे सांगून त्यांचे सक्षमीकरण कसे करत आहात?, यावर जितके कमी बोलेल तितके चांगले. महिलांना निवडीचे स्वातंत्र्य कोठे आहे?, काय परिधान करायचे याचे स्वातंत्र्य विद्यार्थिनींना कुठे आहे?, शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींवर काय परिधान करावे याबद्दल त्यांचे निर्णय लादू नये.

nकॉलेज ही सह-शैक्षणिक संस्था असून, विद्यार्थ्यांच्या धार्मिक श्रद्धा उघड होऊ नयेत, हा या निर्देशांमागील हेतू आहे, असा युक्तिवाद दिवाण यांनी केला. हे परिपत्रक हिजाब, बुरखा किंवा नकाबपुरते मर्यादित नाही, तर फाटलेल्या जीन्स व अशा इतर पोशाखांपर्यंत विस्तारित आहे. त्यावर न्यायमूर्ती खन्ना म्हणाले, विद्यार्थ्यांची नावे त्यांची धार्मिक ओळख प्रकट करणार नाहीत का?, त्यांच्या नावातही धर्म आहे. असे नियम लादू नका.

विद्यार्थिनींना त्यांनी काय परिधान करावे, याच्या निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. कॉलेज त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. हे दुर्दैवी आहे की तुम्हाला अचानक जाग आली की, देशात अनेक धर्म आहेत.      - खंडपीठ

फक्त तीन विद्यार्थिनींचा परिपत्रकावर आक्षेपnमुस्लिम समाजातील ४४१ विद्यार्थिनी आनंदाने महाविद्यालयात शिकत आहेत. त्यांना बुरखा वा हिजाब ठेवण्यासाठी लॉकर देण्यात आले आहेत. यातील तिघी वगळता एकीलाही नियमाची अडचण नाही, असा युक्तिवाद दिवाण यांनी केला.

nतुम्ही बरोबर असू शकता, कारण त्यापैकी बऱ्याच जणी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या असतील. कदाचित काहींचे कुटुंबीय त्यांना ते घालायला सांगत असतील किंवा त्या (स्वतःच्या मर्जीने) परिधान करीत असतील. पण त्या सर्वांना एकत्र अभ्यास करू द्या. हे नियम लागू करू नका, असे न्यायालयाने सांगितले.

nन्यायमूर्ती खन्ना म्हणाले, यावर उपाय म्हणजे योग्य, चांगले शिक्षण. मुलींना वर्गात बुरखा घालण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही व धार्मिक कार्याची परवानगी कॅम्पसमध्ये देता येणार नाही, हे तुमचे म्हणणे योग्य असू शकते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयStudentविद्यार्थी