शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी एकत्र या! राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक : पक्षाचे निरीक्षक आसिफ शेख यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

By admin | Published: March 05, 2016 11:49 PM

जळगाव : दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असतानाही शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाही. शासनाच्या निष्क्रीयतेमुळेच सर्वत्र बिकट स्थिती ओढावली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस शासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेणार आहे. शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष निरीक्षक डॉ.आसिफ शेख यांनी केले.

जळगाव : दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असतानाही शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाही. शासनाच्या निष्क्रीयतेमुळेच सर्वत्र बिकट स्थिती ओढावली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस शासनाच्या विरोधात कठोर भूमिका घेणार आहे. शासनाच्या निष्क्रीयतेचा पंचनामा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष निरीक्षक डॉ.आसिफ शेख यांनी केले.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट तसेच पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी डॉ.आसिफ शेख जळगावात आले होते. दुपारी तीन वाजता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ.शेख पुढे म्हणाले की, केंद्रासह राज्यात सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सत्ताधार्‍यांविरोधात प्रचंड खद्खद् आहे. हेच वातावरण आपल्यासाठी पोषक आहे. शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस तीव्र स्वरुपाची आंदोलने छेडणार आहे. लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडी-अडचणी समजून घ्या, त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा, लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
विकासात्मक दृष्टिकोनातून खाविआला पाठिंबा
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने खान्देश विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. जळगाव शहराचा विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात विकासकामे झाली पाहिजेत, जळगावचा विकास साधला जावा, हा एकमेव उद्देश त्यामागे असल्याचे डॉ.आसिफ शेख म्हणाले.
पक्षात कोणतेही मतभेद नाहीत
मध्यंतरी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने पक्ष टीकेचा धनी ठरला होता. परंतु पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने हे मतभेद दूर करण्यात आले. प्रत्येक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतात. मतभेद असण्यात काही गैर नाही; परंतु मनभेद असता कामा नये. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मनभेद नाहीत. म्हणून जिल्‘ासह राज्यात राष्ट्रवादीचे पक्षसंघटन अतिशय मजबूत आहे. आगामी काळात येणार्‍या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शेख यांनी केले.