शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

आयुक्तांनी केला भेदभाव सहा अभियंत्यांचे निलंबित प्रकरण : सर्वपक्षीय नगरसेवक ठिय्या आंदोलन करणार

By admin | Published: October 14, 2015 9:03 PM

जळगाव : मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांनी महासभेच्या ठरावाविरुद्ध दिलेल्या पत्रामुळे संबंधित अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव झाला होता. अशा परिस्थितीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सहापैकी फक्त चार अभियंत्यांना निलंबित केले. उर्वरित दोन अभियंत्यांना क्लीन चिट देत आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. याविरोधात आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे.

जळगाव : मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांनी महासभेच्या ठरावाविरुद्ध दिलेल्या पत्रामुळे संबंधित अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव झाला होता. अशा परिस्थितीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सहापैकी फक्त चार अभियंत्यांना निलंबित केले. उर्वरित दोन अभियंत्यांना क्लीन चिट देत आयुक्तांनी भेदभाव केल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. याविरोधात आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे. उपमहापौर सुनील महाजन यांच्या दालनात पत्रपरिषद झाली. यावेळी नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे, अनंत जोशी, नितीन बरडे, विनोद देशमुख उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीचा देखावा...उपमहापौर सुनील महाजन म्हणाले, सहा अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव एप्रिलमध्ये झाला होता. या ठरावावर प्रत्यक्ष पाच महिन्यानंतर कार्यवाही झाली. ती पण निष्पक्षपणे झालेली नाही. सहा पैकी केवळ चार अभियंत्यांनाच निलंबित करण्यात आले. उर्वरित दोन अभियंतेही त्यात दोषी असताना, त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न आयुक्तांना मंगळवारी उपस्थित केल्यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकीतून निर्णय घ्यावे लागतात, असे म्हटले आहे. यापूर्वी अनेकांचे निलंबन झाले. तेव्हा सामाजिक बांधिलकी कुठे गेली होती? असा सवाल, उपमहापौर महाजन यांनी उपस्थित केला. समान कारवाई हवी डॉ. अश्विन सोनवणे म्हणाले, की सर्वांवर समान कारवाई होणे अपेक्षित होते. या प्रकरणी सहा अभियंत्यांची चूक असताना केवळ चार अभियंत्यांनाच शिक्षा का? हा प्रकार चुकीचा आहे. आयुक्तांनी केला सभागृहाचा अपमान सभागृहात झालेल्या ठरावानुसार आयुक्तांनी कार्यवाही ने केल्यामुळे सभागृहाचा अपमान झाला असल्याचे मत अनंत जोशी यांनी व्यक्त केले आहे. नगरचना विभागातील संचालकांचा प्रताप उघड नगररचना विभागाचे चंद्रकांत निकम यांची पात्रता नसतानाही ते त्या विभागात कार्यरत असल्याचे अनेकदा प्रशासनाचा निदर्शनास आणून दिले होते. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ते रजेवर जाण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल १०० ते १५० फाईल त्यांनी मंजूर केल्या. तसेच रजेवर असतानाही त्यांनी नाशिक येथे नगररचना विभागातील अभियंत्यांना बोलवून स‘ा केल्याचा गौप्यस्फोट अनंत जोशी यांनी केला. या प्रकरणी मनपा प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.