शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

रोहिणी अहवालाच्या अभ्यासासाठी समिती; हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 8:49 AM

न्या. जी. रोहिणी आयोगाच्या अहवालाच्या सखोल अभ्यासासाठी केंद्र सरकार उच्चस्तरीय समिती नेमण्याची शक्यता आहे. 

- हरिश गुप्तानवी दिल्ली : अन्य मागासवर्गीय (ओबीसी) व सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) यांच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या न्या. जी. रोहिणी आयोगाचा अहवाल सर्वांसाठी खुला करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. २०११ साली करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणाचे निष्कर्ष केंद्र सरकारने नाकारले आहेत. अपुऱ्या माहितीवर हे निष्कर्ष काढण्यात आल्याचा केंद्राचा दावा आहे.

न्या. जी. रोहिणी आयोगाच्या अहवालाच्या सखोल अभ्यासासाठी केंद्र सरकार उच्चस्तरीय समिती नेमण्याची शक्यता आहे. संसदेचे अधिवेशन अठरा दिवसांचे असून त्यामध्ये रोहिणी आयोगाचा अहवाल मांडण्यास केंद्र तयार नाही. हिवाळी अधिवेशन अल्पकाळाचे असून त्यामध्ये या अहवालावर सविस्तर चर्चा होणे शक्य नाही, असा सरकारचा दावा आहे. न्या. जी. रोहिणी आयोगाचा अहवाल त्यावरील कार्यवाही अहवालासह संसदेत मांडण्याचा केंद्राचा विचार आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काँग्रेसकडून हायजॅक करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे.

आयोगाचा अहवाल हा संवेदनशील विषय

४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या  हिवाळी अधिवेशनात न्या. रोहिणी आयोगाचा अहवाल मांडण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्ष करण्याची शक्यता आहे. हा अहवाल संवेदनशील विषय असून त्यावर कोणतेही वादविवाद होऊ नयेत याची काळजी केंद्र सरकार घेत आहे. त्यामुळे न्या. रोहिणी आयोगाच्या अहवालातील शिफारसींचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा केंद्राकडून होण्याची शक्यता आहे. 

सहा वर्षांनी केंद्राला सादर केला अहवाल

अन्य मागासवर्गीयांतील जाती गटांच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या. जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने त्यानंतर सहा वर्षांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाला आपला अहवाल गेल्या ३० जुलै रोजी सादर केला. 

गरिबांवर भरदेशातील गरिबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार केला आहे. या देशात गरिबी ही एकमेव जात आहे असे मी मानतो, असे मोदी म्हणाले होते.

अहवालाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न

ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्याबाबत भाजपच्या नेतेमंडळींनी काहीही भाष्य केलेले नाही. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यात केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत मांडला. त्यावेळी भाजपने या अहवालाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. भाजप व नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड) पक्ष यांचे बिहारमध्ये सरकार असताना जातनिहाय सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे भाजपने आवर्जून सांगितले होते.

टॅग्स :reservationआरक्षण