शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

"या गुंडांच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय?" जंतर-मंतरवरील घोषणाबाजीवरून ओवेसी भडकले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 13:43 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केले होते.

नवी दिल्ली - 'भारत जोडो आंदोलना'च्या पार्श्वभूमीवर काही कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करत रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शन करण्यात आले. यावेळी शेकडो लोक येथे जमले होते. तसेच, यावेळी काही आक्षेपार्ह सांप्रदायिक घोषणाही देण्यात आल्या, असा आरोप आहे. यावर आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे. (Communal slogans at jantar mantar AIMIM owaisi says whats the secret of increasing courage of these goons)

यासंदर्भात ओवेसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, "गेल्या शुक्रवारी द्वारका येथे हज हाऊसविरोधात एक 'महापंचायत' बोलावण्यात आली. हस्ब-ए-रिवायत, या पंचायतीतही मुस्लीम विरोधी घोषणा देण्यात आल्या. जंतर मंतर मोदींच्या महालापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. काल तेथे 'जब मुल्ले काटे जाएंगे..' सारख्या वाईट घोषणा देण्यात आल्या."

ओवैसी म्हणाले, "या गुंडाच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय? यांना माहीत आहे, की मोदी सरकार यांच्या पाठीशी उभे आहे. 24 जुलैला भारत सरकारने रासुका (NSA)अंतर्गत दिल्ली पोलिसांना कुण्याही व्यक्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार दिला होता. तरीही दिल्ली पोलीस शांतपणे तमाशा पाहत उभे होते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की न्याय आणि कायदेशीर कारवाईची मागणी करणेही मजाक बनले आहे. यावर लोकसभेतही चर्चा व्हायला हवी. मी, या मुद्द्यावर लोकसभेच्या नियमानुसार स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे."

मुस्लिमविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी माजी भाजपा प्रवक्ते अश्विनी उपाध्यायसह 6 जणांना अटक

'भारत जोडो मूव्हमेंट'च्या नावाने एकत्र आले होते लोक -पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे काही लोक 8 ऑगस्ट 1947 ला झालेल्या 'भारत छोडो आंदोलना'च्या धर्तीवर ‘भारत जोडो मूव्हमेंट’ नावाने एकत्र आले होते. लोकांना एकत्र आणण्यासाठी या आंदोलनाचा सोशल मीडियावर चांगलाच प्रचार करण्यात आला होता.  जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीत सिंह आणि महासचिव अरविंद त्यागी यांच्यासह सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ वकील अश्विनी उपाध्याय, नीरज नक्षत्र चौहान, लोकसंख्या समाधान फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चौधरी, हिंदू रक्षा दलाचे भूपेंद्र चौधरी, आर्य निर्मात्री सभेचे सुनील आर्य, देवसेनेकडून वृजभूषण सैनी, मां कामधेनू फाउंडेशनचे दीपक तोमर, हिंदू सेनेचे विष्णु गुप्ता आणि देशभरातून शेकडो लोक आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केले होते.

यासंदर्भात बोलताना अश्विनी उपाध्याय म्हणाले, त्यांचा कार्यक्रम यूनायटेड भारतासाठी होता. ज्यांनी धर्मविरोधी घोषणाबाजी केली, त्यांचा आमच्या संघटनेशी काहीही संबंध नाही. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीJantar Mantarजंतर मंतरHinduहिंदूMuslimमुस्लीमAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन