शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

अरे देवा! पावसासाठी इंद्रदेवाच्या विरोधात तक्रार; कारवाईसाठी तहसीलदारांनीही पुढे पाठवला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 7:36 AM

पुरेसा पाऊस होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या एकाने कोणा सामान्य व्यक्तीविरोधात नाही तर थेट इंद्रदेवाविरोधातच तक्रार केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंडा : उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. पुरेसा पाऊस होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या एकाने कोणा सामान्य व्यक्तीविरोधात नाही तर थेट इंद्रदेवाविरोधातच तक्रार केली आहे. उल्लेखनीय म्हणजे कर्नेलगंजच्या तहसीलदारांनीही हा तक्रार अर्ज कारवाईसाठी पुढे पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील कर्नेलगंज तहसीलमध्ये शनिवारी संपूर्ण समाधान दिनाचे (तक्रार निवारण) आयोजन करण्यात आले होते. यावेळी, कौडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या ‘झाला’ गावातील सुमित यादव या व्यक्तीने इंद्रदेवाच्या विरोधात तक्रार केली. ‘पाऊस खूप कमी होतोय. त्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे. जीवजंतू आणि शेतीवर मोठा परिणाम होत आहे. घरात राहणाऱ्या महिला व लहान मुलांचेही प्रचंड हाल झाले आहेत. त्यामुळे कृपया आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती’, असे त्याने तक्रार अर्जात नमूद केले होते. पाऊस पडत नाही आणि दुष्काळ पडत असल्यामुळे, असा विषय या तक्रारीचा आहे. तर इंद्रदेवता (भगवानजी) यांच्याविरोधात तक्रार असल्याचेही स्पष्ट लिहिले आहे.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी घेतली दखल  

सुमित कुमार यांची तक्रार मिळाल्यानंतर कर्नेलगंजच्या तहसीलदारांनीही हे पत्र स्वाक्षरी करून कारवाईसाठी पुढे जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले. नंतर, तक्रार पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आणि हे प्रकरण जिल्हा दंडाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचले. जिल्हा दंडाधिकारी डॉ. उज्ज्वल कुमार यांनी गांभीर्याने दखल घेत पत्र न वाचता पुढे कसे केले, याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे.

न वाचताच तक्रारी पुढे ढकलतात...

अधिकारी लोकं अशाप्रकारे न वाचताच तक्रारी पुढे ढकलतात अशी चर्चा सोशल मीडियात या पत्रावरून रंगली असून हे पत्र प्रचंड व्हायरल होत आहे. तक्रारदाराने दिलेल्या अर्जावर आता प्रशासकीय अधिकारी इंद्रदेवताविरोधात कारवाई कशी करणार, तक्रारकर्त्याचा प्रश्न कसा सोडवणार? यावरूनही नेटकरी मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊस