शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 7:00 PM

राहुल गांधी यांच्यावर देशविरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, तामिळनाडूमधील भाजप नेते डॉ. व्यंकटेश मौर्य यांनी राहुल गांधींविरोधाततामिळनाडूतील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात भारत देश आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात या तक्रार केली आहे. 

तक्रार का केली?एएनआयशी बोलताना भाजप नेते डॉ. व्यंकटेश मौर्य म्हणाले की, "आम्ही राहुल गांधींच्या विरोधात तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांतील 30 पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दिली आहेत. याचे कारण म्हणजे, आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण संपवू, असे वक्तव्य त्यांनी परदेशात केले. राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आणि खासदार आहेत. महत्वाच्या पदावर असल्याने त्यांनी देशाबाहेर जाऊन अशाप्रकारची वक्तव्ये चुकीची आहेत. ते देशांत काहीही बोलू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. पण, परदेशात जाऊन भारत सरकार, एससी-एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबत खोटा प्रचार त्यांनी केला आहे."

देशविरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीते पुढे म्हणाले की, "आम्ही राहुल गांधींच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली असून त्यांच्यावर देशविरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गरज भासल्यास त्यांना अटक करावी, संसद सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशीही आमची मागणी आहे. 30 सप्टेंबरला चेन्नईत आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करणार आहोत. त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे," असेही ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?अमेरिका दौऱ्यात विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधींनी आरक्षणासोबतच देशातील बेरोजगारी, शीख समुदाय, चीनशी संबंध...अशा अनेक मुद्द्यांवर वादग्रस्त विधाने केली होती. वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, भारतात कौशल्याची कमतरता नाही, पण कुशल लोकांचा आदर केला जात नाही. देशातील प्रत्येकाला समान संधी मिळू लागल्यावरच काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, परंतु सध्या भारतात तशी परिस्थिती नाही. याशिवाय, भारतातील शीख समुदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTamilnaduतामिळनाडूBJPभाजपाcongressकाँग्रेस