शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'पूर्ण परीक्षा प्रणाली फसवणूक, पैशाने पेपर विकत घेता येतो...' NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल,मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:27 IST

नीट परिक्षेवरुन आज लोकसभेत खासदार राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले, यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापल्याचे पाहायला मिळाले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नीट परिक्षेवरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापल्याचे पाहायला मिळाले. 

NEET परिक्षेवरुन काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि द्रमुक सारख्या विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आणि NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी लोकसभेत काँग्रेसच्या वतीने प्रभारी नेतृत्व करत असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोध केला यामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले.

Economic Survey: आर्थिक सर्वेक्षणात सरकारनं सांगितला FY25 मध्ये किती राहणार GDP ग्रोथ? एका मोठ्या आव्हानाचाही उल्लेख

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले,  'देशात लाखो विद्यार्थी जे घडत आहे त्याबद्दल चिंतित आहेत त्यांचा भारतीय परीक्षा प्रणाली फसवी असल्याचा विश्वास आहे. जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धतीत पास होऊ शकता, तुम्ही पैशाने कागद खरेदी करू शकता हे लोकांना माहीत आहे आणि विरोधकांचीही तीच भावना आहे.

राहुल गांधी म्हणाले की, 'संपूर्ण देशाला हे स्पष्ट झाले आहे की आपल्या परीक्षा पद्धतीत खूप गंभीर समस्या आहेत. फक्त NEET मध्येच नाही तर सर्व प्रमुख परीक्षांमध्ये असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मंत्री यांना द्यावी लागतील. सिस्टीमिक स्तरावर याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात? मंत्री महोदयांनी स्वतः सोडून सगळ्यांनाच दोष दिला आहे. मला वाटत नाही की त्यांना इथे काय चालले आहे याची मूलभूत माहिती देखील समजत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले. सभागृहाला बोलताना म्हणाले, 'मला कोणाकडूनही माझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नको आहे. माझ्या जनतेने मला निवडून पाठवले आहे. माझ्या पंतप्रधानांनी मला जबाबदारी दिली आहे. देशाची परीक्षा प्रणाली रद्दबातल आहे असे म्हणणे. यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. 

मंत्री धर्मेंद्र  प्रधान यांची काँग्रेसवर टीका

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला.'कपिल सिब्बल यांनी २०१० साली त्यांच्या सरकारमध्ये शिक्षण सुधारणा विधेयक आणले होते. त्यावर आज राहुल गांधी प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या ७ वर्षांत पेपरफुटीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. हे नीट परिक्षा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की NTA नंतर २४० हून अधिक परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा