शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गेल्या 9 वर्षात 23 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडली; कारण एकच- 'राहुल गांधी ऐकत नाहीत...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 18:58 IST

2014 नंतर अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला. पाहा यादी...

Congress News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेसला गेल्या दोन दिवसांत दोन मोठे झटके बसले आहेत. ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी गुरुवारी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनीही शुक्रवारी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरण रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

एखाद्या काँग्रेस नेत्याने पक्ष सोडताना हायकमांडवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राहुल गांधींवर गंभीर आरोप केले होते. आझाद यांची गणना गांधी घराण्याच्या जवळच्या व्यक्तींमध्ये होते. दरम्यान, गेल्या 9 वर्षात जवळपास 23 बडे नेते काँग्रेसमधून बाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी काँग्रेस सोडण्यास हायकमांडला जबाबदार धरले आहे. यात त्यांचा रोख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर होता.

कोणत्या नेत्याने कधी पक्ष सोडला?1. जगदंबिका पाल- 2014 

2. चौधरी बिरेंदर सिंग- ऑगस्ट 2014 

3. अजित जोगी- 2015

4. हिमंता बिस्वा सरमा- 2015

5. गिरीधर गमंग- 2015

6. एसएम कृष्णा- 2017 

7. शंकर सिंह वाघेला- 2017

8. एनडी तिवारी- 2017

9. विजय बहुगुणा- 2016

10. रिटा बहुगुणा जोशी- 2016

11. अशोक चौधरी- 2018 

12. नारायण राणे- 2016 

14. अल्पेश ठाकोर- 2018 

15. राधाकृष्ण विखे पाटील- 2019 

16. टॉम वडाक्कन- 2019

17. सतपाल महाराज- 2014 

18. अमरिंदर सिंग- 2022 

19. जितिन प्रसाद- 2021 

20. ज्योतिरादित्य सिंधिया- 2019 

21. आरपीएन सिंह- 2022

22. कपिल सिब्बल- 2020 

23. गुलाम नबी आझाद- 2022 

या 23 नेत्यांशिवाय इतर अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. यामध्ये प्रियांका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, रिपुन बोरा, सुष्मिता देव, विश्वजित राणे, कीर्ती आझाद आणि ललितेश पती त्रिपाठी यांच्या नावांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरामुळे आसाम, यूपी या राज्यांमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत झाली आहे. सातत्याने नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमधील हायकमांडवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षी उदयपूरमध्ये पक्षाने याबाबत चर्चा केली होती, मात्र या चर्चेनंतरही अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. हे थांबवण्यासाठी काँग्रेसने दोन मोठे निर्णय घेतल्याचे सांगितले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाPoliticsराजकारण