शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

“रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही”: आचार्य प्रमोद कृष्णम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 11:03 AM

Congress Acharya Pramod Krishnam News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पलटवार केला आहे.

Congress Acharya Pramod Krishnam News ( Marathi News ): अयोध्येत रेल्वे स्थानक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणानंतर आता सर्वांना आस लागली आहे ती, रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, एकाबाजूला सोहळ्याला जावे की नाही, यावरून विरोधकांमध्ये संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या सोहळ्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत पंतप्रधान कार्यालय अयोध्येत हलवावे. कारण हे सरकार अयोध्येतूनच चालेल. हे लोक आगामी काळात रामाच्या नावाने लोकांची मते मागतील. कधी पुलवामासारखा हल्ला घडवून आणतील तर कधी आमच्यापेक्षा मोठा रामभक्त कोणीही नाही, असे म्हणतील. राम मंदिरासाठी आम्ही, आमच्या पक्षाने आणि आमच्या लोकांनी सगळे काही दिले आहे. प्रसंगी रक्त सांडले आहे. पण आम्ही कधी असले राजकारण केले नाही, भविष्यात करणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उत्तर देत, चांगलाच पटलवाट केला आहे. 

रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही

प्रभू श्रीरामांचा विरोध करणारे हे लोक नास्तिक आहेत. त्यांना भारताच्या राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. श्रीरामांचा विरोध करायचा आणि भारतात राजकारण करायचे, हे वाईट आहे. अशा राजकारण्यांमुळे भारतातील जनतेला दुःख होते. आता राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हा भारताचा उत्सव आहे. या उत्सव काळात नकारात्मकतेला थारा असू नये. ही आपली संस्कृती नाही. ज्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण मिळाले ते त्यांचे सौभाग्य आहे. निमंत्रण मिळूनही जे लोक मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत हे त्यांचे दुर्भाग्य आहे, अशी टीका कृष्णम यांनी केली.

दरम्यान, अशी टीका होणे आपल्या देशाचे मोठे दुर्दैव आहे. लोकशाहीत असे काही होऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करा, त्यांच्या निर्णयांचा निषेध नोंदवा. परंतु, त्यांचा तिरस्कार करू नका. काही लोक मोदींचा तिरस्कार करण्यात स्वतःचा सत्यानाश करून घेत आहेत. विरोधी पक्षतील काही नेते असे आहेत ज्यांनी स्वतःचे सरकार पाडले आहे. हा स्वतःचा सत्यानाशच आहे. ही मोठी नारात्मकता आहे. लोकशाहीत नकारात्मकतेला स्थान असू नये, असे प्रमोद कृष्णम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या