शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

“ममता बॅनर्जींकडून आम्ही भीक मागितलेली नाही”; जागावाटपावरुन अधीर रंजन चौधरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 4:35 PM

Lok Sabha Election 2024: काँग्रेसने टीएमसीच्या या फॉर्म्युल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना आता चाचपणी करण्यास सुरुवात केली असून, जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रित येऊन जागावाटप कसे असू शकेल, यावर खल सुरू केला आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला दोन जागांची ऑफर दिल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस नेते आणि पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी संताप व्यक्त केला असून, ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.

इंडिया आघाडीत जागावाटपावरून समन्वयापूर्वीच बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, ममता बॅनर्जींना युती नको आहे. ममता बॅनर्जी मोदींची सेवा करण्यात मग्न आहे, अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली. सन २०१९ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये ४३ टक्के मताधिक्यासह २२ जागांवर विजय मिळाला होता. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस प्रबळ पक्ष असून, जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना मिळावा, असे पक्षातील नेत्यांना वाटते.

आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो

काँग्रेसने टीएमसीच्या या फॉर्म्युल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्याकडे कोणी भीक मागितली हे मला माहिती नाही. आम्ही भीक मागायला गेलो नाही. ममता स्वत: सांगत आहेत की, त्यांना युती हवी आहे. आम्हाला ममतांच्या दयेची गरज नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, असा इशारा अधीर रंजन चौधरी यांनी दिला. 

दरम्यान, दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत, असा प्रस्ताव दिला होता. त्याला अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, याबाबत शिक्कामोर्तब झालेले नाही.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेस