शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

“माझी गरज नसेल तर मी निघून जातो”; नवीन संसदेत पोहोचलेले अधीर रंजन चौधरी का झाले नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 4:21 PM

Adhir Ranjan Choudhary New Parliament: नवीन संसद भवन येथील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.

Adhir Ranjan Choudhary New Parliament: संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नवीन संसद भवनाच्या 'गज द्वार' येथे राष्ट्रध्वज फडकावला. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी हा विशेष कार्यक्रम झाला. कारण या अधिवेशनात संसदेचे कामकाज जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात हलवले जाणार आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांसह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आणि माझी गरज नसेल, तर निघून जातो, असेही सुनावले. 

ध्वजारोहणाच्या प्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासह विविध पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार, विविध पक्षांचे नेतेही उपस्थित होते. अधीर रंजन चौधरी यांच्यासह फारूख अब्दुल्ला हेही उपस्थित होते. या सोहळ्याला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित नव्हते. मीडियाशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

माझी गरज नसेल तर मी निघून जातो

अधीर रंजन चौधरी यांना मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित न राहिल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. माझी इथे गरज नसेल तर मला कळवा, मी निघून जाईन. जे इथे आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. मी इथे आहे, ते पुरेसे नाही का? असा उलटप्रश्न अधीर रंजन चौधरी यांनी मीडियाला विचारला. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाचे निमंत्रण उशिरा मिळाल्याचा आरोप करत, राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांना पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली.

दरम्यान, हा कार्यक्रम १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आहे. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता खरगेजींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आमच्या काँग्रेस कार्यकारिणीची आधीच ठरलेली बैठक १६-१७ सप्टेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे, हे सरकारला आधीच माहिती होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली. 

 

टॅग्स :congressकाँग्रेस