शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

'संकल्पपत्र' म्हणजे एका व्यक्तीची 'मन की बात', काँग्रेसची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 15:36 IST

संकल्पपत्रावरुन काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. 

नवी दिल्ली : आमागी लोकसभा निवडणुकीसाठीभाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे नाव दिले आहे. भाजपाने सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार अशा विविध मुद्द्यावर भाजपाने 'संकल्पपत्र' तयार केले आहे. दरम्यान, या संकल्पपत्रावरुन काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. 

काँग्रेसने ट्विटरवर म्हटले आहे की, "जाहीरनाम्याचा फोटो आम्हाला सांगतो की आमच्यासाठी देशातील लोक महत्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी फक्त आपला चेहरा. आमच्या जाहीरनाम्यात देशातील करोडो लोकांचे विचार आहेत. तर भाजपाच्या जाहीरनाम्यात फक्त एकाच व्यक्तीची 'मन की बात'. आता देश आपल्या मनातील निर्णय ऐकवेल."

दरम्यान, आपल्या संकल्पपत्रात 2022 पर्यंत 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यावर विचार करुन 'संकल्पपत्र' तयार करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात सोमवारी 'संकल्पपत्र' प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.   

भाजपाच्या 'संकल्पपत्रा'तील महत्वाचे मुद्दे ...- 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही- सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार.- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार - दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी- छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार- प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य- सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाणार- तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार-सिटीजनशिप विधेयक लागू करणार- सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार- समान नागरी कायदा लागू करणार.- देशातील छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार- सन २०२२ पर्यंत देशभरातील सर्वच रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करणार- कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध - 5 किमी अंतरात बँकिंग सुविधा करणार- सरकारी प्रक्रिया, कामकाज संपूर्ण डिजिटल करण्यावर जोर- कलम 35-अ हटवण्यासाठी प्रयत्न करणार- 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करणार- कुपोषणाचा स्तर घटवणार- आरोग्य सेवा घराच्या दाराशी पोहोचावी अशी व्यवस्था करणार- सर्व घरांत शौचालय असेल यावर काम करणार- सर्वांना घर मिळावे यासाठी संकल्पबद्ध- सर्वांना घरगुती गॅस उपलब्ध करून देणार- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार- नल सें जल यावर काम करणार- दुष्काळ, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय बनवणार 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक