शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

काँग्रेसने केला हल्लाबोल; मोदी सरकारने भीती, दडपण याशिवाय जनतेला काय दिले?

By admin | Published: June 07, 2017 6:09 AM

शेतकऱ्यांत मोदी सरकारविषयी असंतोषाची लाट आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांत मोदी सरकारविषयी असंतोषाची लाट आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातला शेतकरी संप पुकारून रस्त्यावर उतरला आहे. दोन्ही ठिकाणी सरकार भाजपाचे आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांच्यावर बेछूट लाठीमार होत आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती आहे, असे उद्गार राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काढले. ते म्हणाले, आमच्या काळात आम्ही शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी हरतऱ्हेचे निर्णय घेतले. उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळवून देण्याचे आश्वासन मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. पण तीन वर्र्षात ते खोटे ठरल्याने दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत.मोदी सरकारची तीन वर्षांची कारकीर्द निराशाजनक आहे, असो काँग्रेस कार्यकारिणीचे मत असल्याचे नमूद करीत आझाद म्हणाले, या ३ वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने भीती, दडपण, तणाव आणि निराशेशिवाय दुसरे काहीच दिले नाही. दलित, तरुण, महिला, अल्पसंख्य हे सारेच सरकारच्या धाकदपटशाचे शिकार ठरले आहेत. अल्पसंख्य समुदाय दहशतीत वावरत आहे. महिलांवरील अत्याचारांच्या व गुन्हेगारीच्या घटनांमधे तब्बल ३0 टक्के वाढ झाली आहे. पाच वर्षांत १0 कोटी रोजगार पुरवण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने तीन वर्षांत जेमतेम ३ लाख रोजगार निर्माण केले. असंघटीत, संघटीत क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होण्याबरोबर, पायाभूत सोयी आणि बांधकाम क्षेत्रातले लाखो लोक बेरोजगार झाले. नोटाबंदीला काँग्रेसने कडाडून विरोध केला होता. सकल राष्ट्रीय उत्पन्नावर या निर्णयाचा भयंकर प्रभाव पडेल असे माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांनी बजावलेही होते. सरकार मात्र स्वयंघोषित पद्धतीने नोटाबंदीचे लाभ देशाला ऐकवत सुटले. आता या निर्णयाच्या गंभीर परिणामांचे वास्तव लोकांसमोर येते आहे.>प्रसारमाध्यमांवर सरकारच्या धाकदपटशाचा अनुभव घेतलामोदी सरकारची भलामण न करता स्वतंत्रपणे पत्रकारिता करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर सरकार कशा प्रकारे धाकदपटशाचा अवलंब करते, त्याचे उदाहरण गेल्या २४ तासांत आपण सर्वांनी अनुभवले आहे.एनडीटीव्हीवरील धाडींचा नामोल्लेख न करता आझाद म्हणाले, राष्ट्रीयीकृत बँकांची ६ लाख कोटींची रक्कम काही निवडक लोकांकडे थकबाकीच्या स्वरूपात पडून आहे.त्याबाबत कारवाई करण्याऐवजी एका खासगी बँकेच्या वादग्रस्त वसुलीचे निमित्त पुढे करीत एका वृत्तवाहिनीवर धाडी टाकण्याचा प्रयोग सरकारने करून दाखवला. दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग आणि इतर ज्येष्ठ नेते.