शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

VIDEO : 'भाजपने आजपर्यंत पुरावा दिला नाही', सर्जिकल स्ट्राइकवर दिग्विजय सिंहांनी उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:58 IST

Jammu-Kashmir: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी इंडियन आर्मीच्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Bharat Jodo Yatra: 2019 मध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी हल्ल्यात 40 CRPF जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर इंडियन आर्मीने पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली होती. तेव्हा काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला खोटं सांगून पुरावा मागितला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकला खोटं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केंद्र सरकारला फटकारलं. 'भाजपवाले सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलतात, पण पुरावा देत नाहीत' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

सोमवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या जम्मू टप्प्यात आली आहे. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी बोलताना सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दिग्विजय सिंह म्हणाले की, 'केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक किंवा पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कोणताही अहवाल आजपर्यंत संसदेसमोर ठेवला नाही. ते म्हणतात की, आम्ही इतके लोक मारले. पण पुरावा देत नाहीत. खोटं बोलून राज्य करत आहेत' असं विधान त्यांनी केलं.

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, 'पुलवामामध्ये आमचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी पीएम मोदींना विनंती केली होती की जवानांना एअरलिफ्ट करावं, पण पीएम मोदींनी ते मान्य केलं नाही. इतकी मोठी चूक कशी झाली? आजपर्यंत पुलवामाबाबत कोणताही अहवाल संसदेसमोर मांडण्यात आलेला नाही. उरी दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 10 दिवसांनंतर 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली. सरकारनं सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला, पण पुरावा दाखवला नाही,' असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक