शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सर्जिकल स्ट्राइकवरून काँग्रेस-भाजप भिडले; दिग्विजय सिंह म्हणाले, अद्याप पुरावा का दिला नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 09:14 IST

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संजय शर्मा  नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलते की आम्ही इतके लोक मारले; मात्र त्याचा पुरावा मात्र अद्याप दिलेला नाही. हा प्रश्न उपस्थित केल्याने भाजपला पुन्हा एकदा देशभक्ती आणि सैन्याच्या अपमानाचा मुद्दा मिळाला आहे.

नऊ राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला घेरण्याचा मोठा मुद्दा दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या हाती दिला आहे. एका सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्यावर तयार झालेल्या त्सुनामीच्या लहरीवर भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला ५२ जागांवर रोखले होते.

भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये अस्वस्थताएका आठवड्यानंतर ३० जानेवारीला भारत जोडो यात्रा समाप्त होत आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेने देशात तयार झालेले वातावरण आणि यात्रेत होत असलेली गर्दी यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. पुढील महिन्यात त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या तीनही राज्यांत भाजपची परिस्थिती चांगली नाही. त्रिपुरात भाजपच्या हातून सत्ता जाऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या तीन राज्यांतील भाजप नेत्यांसोबत नुकतीच समीक्षा केली.

वक्तव्यामुळे कोंडीदिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष अस्वस्थ दिसत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पत्रकाराचा माइक दिग्विजय सिंह यांच्या चेहऱ्यासमोरून हटविल्याचे दिसून आले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे तयार झालेल्या वातावरणाचा काँग्रेसला फायदा घ्यायची वेळ आलेली असताना दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे कोंडी निर्माण झाली आहे. 

सैन्याचा पराक्रमावर सवाल नको : भाजप- सिंह यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये उत्साह आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर आरोप करीत म्हटले आहे की, त्यांनी सैन्याचा अपमान करणे थांबवावे. - सैन्याचा पराक्रम आणि साहस यावर सवाल करू नयेत. भारतीय सैन्याच्या विरोधात बोलाल तर देश हे सहन करणार नाही.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंह