शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

तीन अंकी जागा जिंकण्याचा काँग्रेसला आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 06:20 IST

महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र, दिल्ली, ओडिशा या राज्यांत चांगल्या कामगिरीची आशा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत तीन अंकी जागा जिंकण्याचा आत्मविश्वास काँग्रेसला वाटत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली राहील, असे या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.काँग्रेसने १९९९च्या लोकसभा निवडणुकांत केवळ ११९ जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फक्त ४४ जागांवर विजय मिळाला. त्या वेळी गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दिल्ली, ओडिशा या राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. एवढेच नव्हेतर, कोणत्याही राज्यात काँग्रेसला दोन अंकी जागा मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला यंदा आपल्या जागा तीन अंकात म्हणजे १00 वा त्याहून अधिक असतील, अशी खात्री वाटत आहे.

राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. लोकसभेतील एकूण जागांच्या दहा टक्केही जागा जिंकता न आल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, दिल्ली, ईशान्य भारतातील राज्ये येथे मोठे यश मिळणार नाही याची खूणगाठ काँग्रेसने मनाशी बांधली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह वरील सात राज्यांवर काँग्रेसची भिस्त दिसत आहे. 

लोकसभा निवडणुकांचा अंतिम म्हणजे सातवा टप्पा १९ मे रोजी पार पडल्यानंतर मतदारसंघनिहाय आढावा घेऊन आपल्याला किती जागा मिळू शकतील, याचा काँग्रेस पुन्हा अंदाज घेणार आहे. मोदी सरकार जनतेला नकोसे झाले असून ते बदलण्यासाठी लोकसभा निवडणुकांत जनतेने मतदान केल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसने पक्षातर्फे देशभर जे सर्वेक्षण केले आहे, त्यातून हा निष्कर्ष निघाला असल्याचे समजते. अलीकडेच ज्या राज्यांत विधानसभा निवडणुकांत झाल्या, तेथील जागांमध्ये २0१४ च्या तुलनेत मोठी वाढ होईल, असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिंघवी म्हणतात, सर्वाधिक जागा जिंकूलोकसभा निवडणुकांनंतर सर्वांत जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे येईल, असा दावा त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. पुरेशा बहुमताच्या बळावर बिगरभाजप सरकार केंद्रात स्थापन करणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र