“८ वर्षे ८ दिशाभूल, भाजपची कमाल, देश उद्ध्वस्त पण मित्र मालामाल”; काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 03:43 PM2022-05-26T15:43:03+5:302022-05-26T15:45:09+5:30

मोदी सरकारला ८ वर्षे झाल्यानिमित्त भाजपकडून जल्लोष केला जात असताना काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.

congress criticised bjp and pm narendra modi over eight years of central govt | “८ वर्षे ८ दिशाभूल, भाजपची कमाल, देश उद्ध्वस्त पण मित्र मालामाल”; काँग्रेसचा घणाघात

“८ वर्षे ८ दिशाभूल, भाजपची कमाल, देश उद्ध्वस्त पण मित्र मालामाल”; काँग्रेसचा घणाघात

Next

नवी दिल्ली: केंद्रात भाजपचे मोदी सरकार स्थापन होऊन ८ वर्षे झाली आहेत. भाजपकडून संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला असताना, काँग्रेसने मात्र मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडून मोदी सरकारच्या ८ मोठ्या कामगिरी प्रस्तुत केल्या जात असताना काँग्रेसने मोदी सरकारचे ८ वर्षांचे रिपोर्ट कार्ड सादर केले असून, भाजपने ८ वर्षांत ८ मुद्द्यांवरून जनतेची दिशाभूल केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. 

काँग्रेसचे महासचिव अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. गेल्या ८ वर्षांत भाजपने केलेल्या कमाल कामगिरीमुळे देश उद्ध्वस्त झाला आहे. भाजपच्या धोरणांचा केवळ त्यांच्या मित्रांना मोठा फायदा झाला असून, तेच मालामाल झाले आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. 

अच्छे दिनऐवजी समाजात द्वेष पसरवला गेला

मोदी सरकारने देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि सत्ता काबीज केली. प्रत्यक्षात मात्र तसे घडताना दिसत नाही. देशातील समाजांमध्ये द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याशिवाय काँग्रेसने यावेळी एक पुस्तिकाही प्रकाशित केली आहे. मोदी सरकार आल्यापासून देशातील महागाई वाढतच चालली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. याउलट शेतकऱ्यांसमोर नानाविध अडचणी उभ्या राहिल्याची टीका सुरजेवाला यांनी केली. तसेच आपल्या अपयशांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी नवनवीन मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जात असल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. 

दरम्यान, भाजप सरकार आपल्या फायद्यासाठी करवाढ करत आहेत. आताच्या घडीला देशात ४८ कोटी बेरोजगार असून, ४२ लाख सरकारी रिक्त पदे अद्यापही भरली गेलेली नाहीत. देशाच्या जीडीपीची अवस्था बिकट असून, रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे. मोदी सरकारने विमानतळेही विकली. देशात मागील ८ वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या दंगली झाल्याचा मोठा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. 
 

Web Title: congress criticised bjp and pm narendra modi over eight years of central govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.