शहरं
Join us  
Trending Stories
1
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
2
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
3
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
4
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
5
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
7
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
8
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
9
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
10
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
11
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
12
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
13
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
14
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
15
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
16
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
17
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
18
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
19
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
20
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...

EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 20:57 IST

महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने दिल्लीत पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली होती.

Congress CWC Meeting : महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने दिल्लीत पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा मुद्दा उपस्थित केला. भारताने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी पारंपरिक बॅलेट पेपरकडे परतावे. या गोष्टीत इतर कुठलाही मध्यम मार्ग असू शकत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी पक्षाचे नेते राहुल गांधी म्हणाले की, आता निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करावे लागतील. कारण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली नाही. जात जनगणना आणि आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवरून वाढवण्याबाबत काँग्रेसने जशी स्पष्ट भूमिका घेतली आहे, तशीच संभल प्रकरणासारख्या अन्य मुद्दय़ांवरही ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.

बैठकीनंतर केसी वेणुगोपाल काय म्हणाले?बैठकीबाबत केसी वेणुगोपाल म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाली. CWC ने पक्षाची निवडणूक कामगिरी आणि संघटनात्मक मुद्द्यांबाबत अंतर्गत समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समित्या बुथ आणि जिल्हा स्तरावर पक्षाच्या स्थितीचे मूल्यांकन करतील. यासोबतच, आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक तयारी मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगावर दबाव आणणे आवश्यक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या धर्तीवर निवडणूक आयोगाची जबाबदारी सुनिश्चित करण्यावर भर दिला जाईल, असे काँग्रेसने ठरवले आहे. निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणणे आवश्यक असल्याचे पक्षाचे मत आहे. यासोबतच CWC ने 1991 च्या 'Places of Worship (Special Provisions) Act' अंतर्गत आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, ज्याचे भाजपकडून उघडपणे उल्लंघन केले जात आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसEVM Machineईव्हीएम मशीन