शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

काँग्रेस हा मृत्यूसारखा आहे, कधी बदनाम होत नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Published: March 09, 2016 2:22 PM

आम्ही कितीही टीका केली तर विरोधी पक्षावर टीका असं म्हटलं जातं, काँग्रेसवर टीका असं म्हटलं जात नाही असं मोदी म्हणाले

ऑनलाइनल लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - मृत्यूला एक वरदान आहे, की तो कधी बदनाम होत नाही. कर्करोगानं मरण आलं, तर कर्करोग बदनाम होतो, अपघातानं मृत्यू आला तर अपघात बदनाम होतो पण मृत्यू कधी बदनाम होत नाही, असं बुचकळ्यात टाकणारं उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्यूची तुलना काँग्रेसशी केली. आम्ही कितीही टीका केली तर विरोधी पक्षावर टीका असं म्हटलं जातं, काँग्रेसवर टीका असं म्हटलं जात नाही असं मोदी म्हणाले. आज राज्यसभेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन करताना ते बोलत होते. सुशिक्षितांनाच निवडणुका लढवण्याचा अधिकार राजस्थानसारख्या राज्यानं दिला असून याबाबत बोलताना मोदी यांनी याचं समर्थन केलं. अशिक्षिततेला गांभीर्यानं न घेतल्यामुळे ही वेळ आल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्यापूर्वी गायकवाड संस्थानमध्ये मुलीला शिक्षण दिलं नाही तर एक रुपया दंड होता. त्यामुळे महिला साक्षर होत्या. मात्र, स्वातंत्र्यानंतर हा प्रकार बंद झाला आणि अशिक्षितता वाढल्याचे मोदी म्हणाले.
विशेष म्हणजे, मोदींनी भाषण समाप्त करताना निदा फाजलींची साथ चलो ही शायरी ऐकवत विरोधकांना बरोबर चालण्याचं आवाहन केलं.
 
निदा फाजलींची विरोधकांना उद्देशून मोदींनी ऐकवलेली कविता:
 
सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो 
सभी हैं भीड़ में तुम भी निकल सको तो चलो
 
इधर उधर कई मंज़िल हैं चल सको तो चलो 
बने बनाये हैं साँचे जो ढल सको तो चलो
 
किसी के वास्ते राहें कहाँ बदलती हैं 
तुम अपने आप को ख़ुद ही बदल सको तो चलो
 
यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता 
मुझे गिराके अगर तुम सम्भल सको तो चलो
 
यही है ज़िन्दगी कुछ ख़्वाब चन्द उम्मीदें 
इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
 
सबसिडी योग्य लाभार्थींना देण्याचा प्रयत्न,आधुनिक तंत्राद्वारे सबसिडीचा गैरवापर रोखणार 
मी मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे अर्थतज्ज्ञ नसल्याने मी विद्वान नसेन, पण मलाही काही गोष्टींची माहिती आहे 
२०२२ पर्यंत शेतक-यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे 
मुद्रा बँकेद्वारे करोडो लोकांना पैसे दिले.
2015 मध्ये सर्वात जास्त कार उत्पादन, 50 मोबाईल कंपन्या भारतात आल्या 
कोळसा खाण वाटपामुळे साडेतीन लाख कोटी सरकारच्या तिजोरीत जमा झाले 
रेल्वेच्या टेंडर प्रक्रियेचे विकेंद्रीकरण
जगात दोन प्रकारची माणसं असतात, काही लोक काम करतात तर काहीजण श्रेय घेतात, तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा कारण त्यात स्पर्धा कमी आहे 
 श्रेय घेण्याचा प्रयत्न करा त्यात काही चुकीचं नाही 
व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचा आमचा प्रयत्न 
चंदिगडमध्ये वीज असतानादेखील 30 लाख केरोसीन वापरलं जायचं
माझ कामकाज पाहण्यापेक्षा तोच मायक्रोस्कोप घेऊन काम केलं असत तर प्रगती झाली असती 
काँग्रसने सत्तेत असताना काम केलं असत तर जन धन योजना मला आणावी लागली नसती 
मी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पाहणी केली, अनेक प्रकल्प रखडलेले आहेत 
 देशभरात १०-१५ वर्षांपासून अनेक प्रकल्प रखडले होते, आम्ही सुमारे ३०० प्रकल्प सुरू केले
जीएसटीसह अन्य महत्त्वाच्या विधेयकांना देशासाठी पाठिंबा द्या - पंतप्रधान मोदींचे विरोधकांना आवाहन.
दोन्ही सभागृहांमध्ये समन्वय असणे महत्वाचे, प्रलंबित विधेयकं मंजूर होण्याची देश वाट पाहत आहे 
मी गुलाम नबी आझाद यांना आवाहन करतो की त्यांनी ३० टक्के अशिक्षितांना उमेदवारी द्यावी
शिक्षणासंदर्भातील गैरसोयींबद्दल आपण काळजी केली पाहिजे आणि त्यावर उपाय शोधले पाहिजेत
गायकवाड संस्थान अशिक्षितांना करायचे दंड, ते योग्य होते 
मागील अधिवेशन गोंधळामुळे वाया गेलं, या अधिवेशनातही गोंधळामुळे ७२ तासा वाया गेले आहेत 
मृत्यूला एक वरदान मिळाले आहे, मरण आले तरी मृत्यूला कोणीच दोष देत नाही, मृत्यू कसा आला, त्या कारणास दोष दिला जातो. काँग्रेसलाही तसेच वरदान आहे. काँग्रेसवर टीका केली तर मीडियामध्ये काँग्रेसचं नाव येत नाही, विरोधकांवर टीकास्त्र असं म्हटलं जातं. काँग्रेसची कधीच बदनामी होत नाही.
संसदेचे कामकाज सुरळीत चालू दिल्याबद्दल मी विरोधकांचे आभार मानतो, सर्वांनाच बोलण्याची संधी मिळाली.
काल रात्री उशीरापर्यंत संसदेचे कामकाज सुरू होते, मात्प कोणाच्याही चेह-यावर त्याचा थकवा नव्हता तर काम ज्या पद्धतीने झाले, त्यामुले सर्वजण खुश होते. 
 संसदेच्या अधिवेशनादरम्यान सर्व सदस्य सक्रिय होते. 
विनाअडथळा, संसदेचे कामकाज चालू दिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणादरम्यान केले. राष्ट्रपतींच्या आवाहनाला सगळ्यांनी दुजोरा दिला.