शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

काँग्रेसच्या ६४ जागांचा निर्णय होणार दिल्लीत

By admin | Published: September 12, 2014 2:16 AM

प्रचंड काथ्याकूट करून देखील आपल्या वाट्याच्या १७४ जागांपैकी ६४ मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार ठरविण्यात काँग्रेसच्या छाननी समितीला अपयश आले आहे.

यदु जोशी, मुंबईप्रचंड काथ्याकूट करून देखील आपल्या वाट्याच्या १७४ जागांपैकी ६४ मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार ठरविण्यात काँग्रेसच्या छाननी समितीला अपयश आले आहे. उर्वरित ११० ठिकाणचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीची शेवटची बैठक बुधवारी रात्री येथे आटोपली. समितीने गेले दहा-बारा दिवस तासन्तास खल केला. एकेका मतदारसंघात तीन-तीन नावे होती. ती कमीकमी करीत नेली. तरीही ६४ मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुकांची नावे आहेत. बहुतेक ठिकाणी दोन-दोन नावे यादीमध्ये आहेत.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, छाननी समितीच्या पातळीवर चर्चेतून १०० हून अधिक नावे ठरविता आली हे मोठे यश आहे. आधी प्रदेश निवड मंडळाला आणि नंतर छाननी समितीला विश्वासात घेऊन ही प्रक्रिया करण्यात आली.छाननी समितीने निश्चित केलेली नावे १४ सप्टेंबरला केंद्रीय निवड मंडळासमोर ठेवली जातील आणि त्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली जाईल, अशी शक्यता आहे. ज्या मतदारसंघांमध्ये एकपेक्षा जास्त नावे आहेत त्या बाबतचा निर्णय केंद्रीय मंडळ करेल. छाननी समिती त्यासाठी सहकार्य करेल. सूत्रांनी सांगितले की, विद्यमान सर्व आमदारांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाही. फारतर चार-पाच आमदारांना वगळले जाईल, असे आधी म्हटले जात होते. तथापि, आता हा आकडा मोठाही असू शकेल. काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदारांना बदलून नवीन लोकांना संधी दिली आणि त्याचा फायदा झाल्याची गेल्या वर्षभरात काही राज्यांमधील उदाहरणे त्यांच्या समर्थनार्थ दिली जात आहेत, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाची पुढची चर्चा होण्याचा मुहूर्त अद्याप निघालेला दिसत नाही. आता सगळेकाही दिल्लीत ठरेल, असे ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीला ११४ पेक्षा एकही जागा वाढवून देऊ नये, अशी प्रदेश काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले. सूत्रांनी सांगितले की, ज्या ६४ मतदारसंघांमधील उमेदवार अद्याप ठरविण्यात आलेले नाहीत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटू शकतील असे काही मतदारसंघ आहेत. काँग्रेस गेल्या तीन निवडणुकात जिंकू शकलेली नाही आणि तिथे राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार असेल तर ती जागा सोडण्याची पक्षाची तयारी असेल. उमेदवार न ठरण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, काही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण असतील यावर काँग्रेसचे उमेदवार निश्चित केले जातील.