शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक, मित्रपक्षांना डुबवण्याचे केलं काम"; दिल्लीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 21:03 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयात पोहोचले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आम आदमी पक्षासोबतच काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला. ज्याने दिल्ली लुटली त्याला परत करावी लागेल. कॅगचा अहवाल विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मांडला जाणार असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी अरविंद केजरीवाल यांना इशारा दिला. दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक झाल्याचे म्हणत पंतप्रधानांनी राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं. भाजपचं मतं मिळवण्यासाठी काँग्रेसने हिंदू बनण्याचा प्रयत्न केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा शून्य जागा मिळाल्या. भाजपच्या मुख्यालयातून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावरुनच काँग्रेसवर निशाणा साधला. देशाच्या राजधानीत सर्वात मोठ्या पक्षाने शून्याची दुहेरी हॅटट्रिक केली आहे. गेल्या तीन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे सर्वात जुन्या पक्षाने शून्याची दुहेरी हॅटट्रिक केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेस पक्ष सोबत असलेल्यांना बुडवतो

"देशातील सर्वात जुन्या पक्षाने सलग सहावेळा देशाची राजधानी दिल्लीत आपले खाते उघडले नाही. त्यांचे लोक पराभवाचे गोल्ड मेडल घेऊन फिरत आहेत. काँग्रेस पक्ष जो सोबत असेल त्याला बुडवतो. काँग्रेसने आपल्या साथीदारांनाही बुडवले आहे. आजची काँग्रेस आपली भाषा आणि आपला अजेंडा चोरण्यात व्यस्त आहे. काँग्रेस त्यांच्या मित्रपक्षांकडून मुद्दे चोरते आणि नंतर त्यांच्याच व्होटबँकेला रोखते," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दिल्लीत इंडिया आघाडी काँग्रेसच्या विरोधात

"आता काँग्रेसची नजर राज्यांतील पक्षांवर आहे. इंडिया आघाडीच्या पक्षांना आता काँग्रेसचे चरित्र कळू लागले आहे. ज्या व्होटबँकमधून ते जिंकत आहेत ती काँग्रेस परत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मित्रपक्षांना समजू लागले आहे. दिल्लीतही हे दिसून आले आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात इंडिया आघाडीने निवडणूक लढवली होती. काँग्रेसला रोखण्यात ते यशस्वी झाले, पण आपदाला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. आजची काँग्रेस ही स्वातंत्र्य चळवळीच्या काळात होती तशी राहिलेली नाही," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेसमध्ये अर्बन नक्षलवादाचा डीएनए

"आजची काँग्रेस राष्ट्रहिताचे नाही तर शहरी नक्षलवाद्यांचे राजकारण करत आहे. काँग्रेसचे नेते भारताशी लढत असल्याचे सांगतात तेव्हा ती नक्षलवाद्यांची भाषा असते. समाज आणि देशात अराजकता आणण्याची ही भाषा आहे. इकडे दिल्लीत आपदाही याच शहरी नक्षलवादी विचारसरणीला पुढे नेत होती. काँग्रेसची शहरी नक्षलवादी विचारसरणी देशाच्या विचारसरणीवर हल्ला करते. शहरी नक्षलवाद्यांचा डीएनए काँग्रेसमध्ये शिरला आहे, अस आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

"काँग्रेसने २०१४ नंतर ५-७ वर्षे हिंदू होण्याचा प्रयत्न केला. मंदिरात गेले, हार घातले. असे करून भाजपची व्होट बँक फोडून काही मते मिळतील, असे त्यांना वाटले. पण काहीही न मिळाल्याने त्यांनी हे कामही बंद केले. हा भाजपचे काम आहे आणि इथं आपलं काही होणार नाही हे त्यांना समजलं, असं पंतप्रधानांनी म्हटलं.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी